शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

कोणत्याही महाराजांकडे जाऊन मोक्षप्राप्ती होत नाही - श्याम मानव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:39 IST

कोणत्याही महाराज, बाबांकडे सिद्धी किंवा चमत्कार करण्याचे सार्मथ्य नाही. ते केवळ धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसगतच करीत आहेत. सर्वच बाबा, महाराज भोंदू असून, ते स्त्रीलंपट आहेत. आतापर्यंत अनेक महाराजांनी स्त्री, युवती, मुलींचे शोषण केले आहे. कोणत्याही महाराज, बाबाच्या नादी लागून आणि त्यांच्या सान्निध्यातून मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यामुळे समाजातील महिलांनी अशा भोंदू साधू, बाबांपासून सावध राहिले पाहिजे, अशा परखड शब्दात अंनिसंचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी आवाहन केले. 

ठळक मुद्देव्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद आयएमए, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोणत्याही महाराज, बाबांकडे सिद्धी किंवा चमत्कार करण्याचे सार्मथ्य नाही. ते केवळ धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसगतच करीत आहेत. सर्वच बाबा, महाराज भोंदू असून, ते स्त्रीलंपट आहेत. आतापर्यंत अनेक महाराजांनी स्त्री, युवती, मुलींचे शोषण केले आहे. कोणत्याही महाराज, बाबाच्या नादी लागून आणि त्यांच्या सान्निध्यातून मोक्षप्राप्ती होणार नाही. त्यामुळे समाजातील महिलांनी अशा भोंदू साधू, बाबांपासून सावध राहिले पाहिजे, अशा परखड शब्दात अंनिसंचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी आवाहन केले. आयएमए व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्यावतीने  सोमवारी आयएमए सभागृहात आयोजित ‘वृक्ष तेथे छाया.. बुवा तेथे बाया’ या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे होते. बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर, आयएमएचे सचिव डॉ. रणजित देशमुख, डॉ. हर्षवर्धन मालोकार हे मंचावर उपस्थित होते. प्रा. श्याम मानव म्हणाले, ‘वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया’ हे वाक्य पूर्णत: खरे आहे. कोणताही बाबा बायकांच्या भानगडीशिवाय नाही. देशभरात अनेक बाबा, महाराज आहेत आणि ते सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांच्या डोळय़ांदेखत धर्म, श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसवणूक करीत आहेत. महिला वर्ग तर अक्षरश: बाबांच्या किती आहारी गेला आहे, याची उदाहरणे देत प्रा. श्याम मानव यांनी, अनेक महाराजांच्या चमत्कारांचा, त्यांच्या फसवेगिरीच्या, रासलीलांच्या कथाच श्रोत्यांसमोर मांडल्या. त्यांनी मीही अनेक बाबांचा भक्त होतो.प्रत्येक बाबामध्ये काहीतरी दैवीशक्ती असते, असा समज होता. पुढे बाबांच्या रासलीलांनी परिचित झालो. केडगावकर बाबा हा स्वत:ला राजयोगी समजत असे आणि तो स्त्रियांकडून र्मदन करून घेत असे. विद्यानंद नावाच्या एका बाबाला तर स्त्रियांचे प्रचंड आकर्षण असे. असे सांगत प्रा. मानव यांनी अनेक महाराजांचा नावानिशी उल्लेख करीत त्यांनी केलेले चमत्कार व त्यांच्या रासलीलांच्या कथाही प्रात्यक्षिकांसह श्रोत्यांना ऐकविल्या. हे भोंदू बाबा, महाराज समाजातील श्रद्धेचा फायदा घेऊन मोक्ष, दैव, सिद्धी आणि धर्माचा वापर करून आपणच सिद्धपुरूष असल्याचे भासवतात आणि आपले शब्द प्रमाण, पुरावा आहेत. हे समाजाला सांगतात आणि समाजातील सुशिक्षित, विज्ञानवादी लोक त्यांच्या भुलथापांना बळी पडतात. असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे यांनी केले.-