शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 03:33 IST

आमदार बाजोरियांची पोलीस प्रशासनाला सूचना

अकोला, दि. ८- इयत्ता दहावी आणि बारावीचा पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंना शहर वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली जात आहे. हा प्रकार ऐन पेपरच्या दिवशी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांंसह त्यांचे पालक कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर संपेपर्यंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली. इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांंची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. चांगल्या टक्केवारीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात. विद्यार्थ्यांंसोबतच पालकांचीही धांदल उडाल्याचे पहावयास मिळते. अशावेळी ऐन सकाळी-सकाळी पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंची वाहने अडवून त्यांच्याकडून दुचाकी चालवण्याचा परवाना तसेच वाहनांच्या कागदपत्रांची मागणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे. या प्रक्रियेला १५ ते २0 मिनिटांचा अवधी लागत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी जीवाचे रान करतात. यादरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या असंख्य पालकांनी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे बुधवारी धाव घेतली. पोलिसांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे किमान परीक्षा होईपर्यंंत पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांंकडून वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रांची तपासणी न करण्याची मागणी त्यांनी आ. बाजोरियांकडे लावून धरली. परीक्षेचा काळ व विद्यार्थ्यांंची मानसिकता लक्षात घेता परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना आ. बाजोरिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली.पोलीस प्रशासनाने दिला होकार!आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांंंचे पेपर संपेपर्यंंंत त्यांच्या वाहनांची तपासणी न करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांंंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. काही पालकांनी तक्रारी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंची वाहने तपासली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेऊन परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंंच्या वाहन तपासणीला शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.-प्रमोद काळे, शहर वाहतूक शाखाप्रमुख