शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

परीक्षा संपेपर्यंत विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 03:33 IST

आमदार बाजोरियांची पोलीस प्रशासनाला सूचना

अकोला, दि. ८- इयत्ता दहावी आणि बारावीचा पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंना शहर वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालविण्याचा परवाना तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली जात आहे. हा प्रकार ऐन पेपरच्या दिवशी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांंसह त्यांचे पालक कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर संपेपर्यंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली. इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांंची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. चांगल्या टक्केवारीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात. विद्यार्थ्यांंसोबतच पालकांचीही धांदल उडाल्याचे पहावयास मिळते. अशावेळी ऐन सकाळी-सकाळी पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंची वाहने अडवून त्यांच्याकडून दुचाकी चालवण्याचा परवाना तसेच वाहनांच्या कागदपत्रांची मागणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून होत आहे. या प्रक्रियेला १५ ते २0 मिनिटांचा अवधी लागत असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचताना विद्यार्थी जीवाचे रान करतात. यादरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या असंख्य पालकांनी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे बुधवारी धाव घेतली. पोलिसांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे पेपर सोडवण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांंच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे किमान परीक्षा होईपर्यंंत पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांंकडून वाहन चालविण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रांची तपासणी न करण्याची मागणी त्यांनी आ. बाजोरियांकडे लावून धरली. परीक्षेचा काळ व विद्यार्थ्यांंची मानसिकता लक्षात घेता परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंची अडवणूक न करण्याची सूचना आ. बाजोरिया यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, शहर वाहतूक शाखाप्रमुख प्रमोद काळे यांना केली.पोलीस प्रशासनाने दिला होकार!आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांंंचे पेपर संपेपर्यंंंत त्यांच्या वाहनांची तपासणी न करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांंंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. काही पालकांनी तक्रारी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंची वाहने तपासली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या प्रकाराची दखल घेऊन परीक्षा संपेपर्यंंंत विद्यार्थ्यांंंच्या वाहन तपासणीला शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला.-प्रमोद काळे, शहर वाहतूक शाखाप्रमुख