शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

नात्यांवर विश्वास नाही; मैत्री श्रेष्ठ

By admin | Updated: June 3, 2017 01:30 IST

अनाथांचा नाथ सागर रेड्डीचे मत : अकोल्यात साधला संवाद !

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चित्रपटाची कथा व्हावी, असा आयुष्याचा प्रवास. बालपणीच आई-वडिलांची हत्या. नातेवाइकांनी अनाथाश्रमात टाकून दिले. अनाथाश्रमातून बाहेर पडताच दाही दिशा मोकळ्या; पण जायचे कोठे माहीत नाही. नोकरी करण्याची तयारी; पण कागदपत्रे नाही. मग आयुष्य जगायचे कसे, हा मोठा प्रश्न; परंत आयुष्याचे रडगाणे गात न बसता स्वबळावर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करू न नोकरी करतो. आज हा २८ वर्षीय युवक सागर रेड्डी आपल्यासारख्या अनेक मुला-मुलींचे आयुष्य एकता निराधार संघटनेच्या माध्यमातून सुंदर करीत आहे. सागर रेड्डी याने शुक्रवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृह येथे अकोलेकरांसोबत संवाद साधला. सागरने आपला संघर्षमय जीवन प्रवास सांगितला. सागर रेड्डीने संवादाच्या पहिल्याच टप्प्यात सांगितले की, माझा नातेवाईक आणि नात्यांवर अजिबात विश्वास नाही. विश्वास तो फक्त मैत्रीवर आहे. ‘सैराट’ यंदाचा गाजलेला मराठी चित्रपट़ कथानकाचा शेवट ज्याप्रमाणे होतो, तोच शेवटचा प्रसंग सागर रेड्डीच्या आयुष्यात बालपणी आला. एक वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांची हत्या त्याच्या समोरच करण्यात आली. काही वर्ष आजोबांजवळ राहिला. आजोबांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याला लोणावळ्याच्या अनाथाश्रमात टाकले. १८ वर्षानंतर अनाथाश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर कोठे जायचे, काय करायचे, कसे जगायचे, असे प्रश्न पडले. पाऊस पडत होता. एक रात्र आश्रमाजवळच्या मंदिरातच काढली. दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली. जवळ पुराव्यादाखल कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळाली नाही. रेल्वे स्टेशनवरच मुक्काम होता. खायला काही मिळत नव्हते. रेल्वे स्टेशनसमोरच केबल टाकण्याचे काम सुरू होते. तेथे जाऊन कामाची विचारपूस केली. केबल ओढण्याचे काम मिळाले. अनाथाचं प्रमाणपत्र जवळ होतं; पण रेड्डी आडनावामुळे ओपन कॅटेगिरीत मोडल्या जात असल्यामुळे पूर्ण फी भरावी लागत होती. जेव्हा पहिल्यांदा उच्चशिक्षणासाठी प्रयत्न केला तेव्हा कळलं की अनथांसाठी कोटा नसतो, असे सागर रेड्डीने सांगितले. आज सागर नामांकित कंपनीमध्ये अभियंता आहे.नोकरी करू न जमा केलेली १८ लाखांची पुंजी सागरने अनाथ मुला-मुलींकरिता खर्च केला. आज १,४०० अनाथ मुलांना सागरने रोजगार मिळवून दिला. विविध २८ देशांचा दौरा करू न युवावर्गाला विनामूल्य मार्गदर्शन करत आहे. अनाथांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी सागर लढत आहे. संवाद सभेचे आयोजन निर्भय बनो जनआंदोलन व सेवाश्री बहूद्देशीय संस्थेने केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन हरणे यांनी केले.