शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

‘टीपीकल’ अधिकारी म्हणून वागलो नाही - जी. श्रीकांत

By admin | Updated: April 24, 2017 20:58 IST

अकोला- जिल्ह्याचा दंडाधिकारी असतानाही आपण कधीही ‘टीपीकल’ अधिकारी म्हणून वागलो नाही, असे मनोगत मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

अकोला : जिल्ह्यात गत २३ महिने जिल्हाधिकारी म्हणून काम करताना शासनाच्या योजना अधिक लोकाभिमूख कशा करता येतील, याचा प्रयत्न केला. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी ‘स्टाईल’ असते. माझीही एक वेगळी स्टाईल आहे. जिल्ह्याचा दंडाधिकारी असतानाही आपण कधीही ‘टीपीकल’ अधिकारी म्हणून वागलो नाही, असे मनोगत मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी औपचारिक संवाद साधताना मावळते जिल्हाधिकारी बोलत होते. गत दोन वर्षांपूर्वी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या जी. श्रीकांत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांची जिल्ह्यातील कारकिर्द खुपच चर्चेची राहिली. याबाबत बोलताना जी. श्रीकांत म्हणाले, ‘‘अकोल्यात आल्यानंतर मी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. शासनाच्या योजना लोकाभिमूख व्हाव्या, यासाठी त्यांची जाहीरात करणे गरजेचे असते. या योजनो लोकांपर्यंत पोहचाव्या यासाठी मी वेगळ्या पद्धतीने काम केले. याला पब्लिसिटी स्टंट असे म्हटल्या गेले, असले तरी त्यात मला काही वावगे वाटत नाही. मी स्वत:च्या फायद्यासाठी कधीही पब्लिसिटी स्टंट केला नाही. चौकट मोडून काम करणे ही माझी स्टाईल आहे. मी टिपिकल अधिकारी म्हणून वागलो नाही व यापुढेही वागणार नाही.’’ काम करताना काही निर्णय घ्यावे लागतात. जास्त-जास्त लोकांचा फायदा व्हावा, असे निर्णय आपण घेतल्याचेही जी. श्रीकांत यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे (रोहयो) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र दिनी महाश्रमदानजिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धेअंतर्गत सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांत अनेक जण श्रमदान करीत आहेत. यामध्ये आपणही श्रमदान करावे, अशी अनेकांची इच्छा आहे. यासाठी येत्या १ मे या महाराष्ट्र दिनी आकोट तालुक्यातील उमरा व आसेगाव बाजार येथे महाश्रमदान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विभागातील हा पहिलाच प्रयोग असून, जिल्ह्यातील नागरिक या दोन गावांमध्ये जाऊन श्रमदान करू शकतात. आयुष्यातील दोन तास श्रमदान असे या उपक्रमाचे घोषवाक्य असल्याची माहिती तालुका समन्वयक समाधान वानखडे, संघपाल वाहुरवाघ, सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे, नरेंद्र काकड यांनी दिली. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.