शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळी आली; पण गरिबांना मिळाली नाही डाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:21 IST

- संतोष येलकर अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात ...

- संतोष येलकर

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात हरभरा डाळ व उडीद डाळ वितरीत करण्यासाठी, मागणीप्रमाणे डाळींचा साठा अद्याप जिल्हयातील गोदामांमध्ये उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दिवाळी आली असली तरी, जिल्ह्यातील गरिब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील हरभरा व उडीद डाळ मिळाली नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यात असल्याने, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.केंद्र शासनाने खरेदी केलेल्या हरभरा व उडीदाची भरडई करुन, प्राप्त होणारी हरभरा डाळ व उडीद डाळ राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील कुटुंब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना स्वस्त दराने वितरीत करण्याचा निर्णय गत १७ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपये प्रती किलो दराने हरभरा डाळ आणि ४४ रुपये प्रति किलो दराने उडीद डाळ वितरीत करण्यासाठी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांमार्फत डाळ साठयांची मागणी (नियतन ) शासनाकडे करण्यात आली. दिवाळीचा सण आला असला तरी, अकोल्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळीचा साठा गोदामांमध्ये उपलब्ध झाला नसल्याने, ५ नोव्हेंबरपर्यंत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचे वितरण सुरु करण्यात आले नाही. दिवाळी आली असली तरी, गरिबांना स्वस्त दरातील हरभरा डाळ व उडीद डाळ मिळाली नसल्याने, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरातील डाळींचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२ लाख ४१ हजार लाभार्थ्यांसाठी केवळ २०० क्विंटल डाळ उपलब्ध !अकोला जिल्ह्यात प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत २ लाख ४१ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी असून, या शिधापत्रिकाधारकांना हरभरा डाळ व उडीद वितरीत करण्यासाठी ४ हजार ८४० क्विंटल डाळ साठ्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली. त्या तुलनेत ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ २०० क्विंटल हरभरा डाळीचा साठा अकोल्यातील गोदामात उपलब्ध झाला.

४८४० क्विंटल डाळीची मागणी !अकोला जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी स्वस्त दरात हरभरा डाळ आणि उडीद डाळ वितरीत करण्यासाठी २ हजार ४२० क्विंटल हरभरा डाळ आणि २ हजार ४२० क्विंटल उडीद डाळ अशा एकूण ४ हजार ८४० क्विंटल डाळ साठ्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोला