शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची भूमिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:09 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी ऑनलाइन  भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू  असून, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा,  अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते यांची माहिती अर्जांची छाननी पूर्ण करण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी ऑनलाइन  भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू  असून, दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा,  अशी आमची भूमिका असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा  शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिली.कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यासाठी  दिवाकर रावते  अकोल्यात आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. मंगळवारी  झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भात कमी झालेला  पाऊस, त्यामुळे पाण्याची कमतरता आणि कर्जमाफीच्या मुद्यावर  चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा लाभ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले, असे रावते म्हणाले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी  ऑनलाइन भरलेल्या अर्जांची छाननी तातडीने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न सुरू असून, ग्रामपंचायत निवडणुका नसलेल्या गावांमध्ये  चावडी वाचनाद्वारे कर्जमाफीच्या अर्जांच्या छाननीचे काम पूर्ण  झाले असून, ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या गावांमधील  कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन रखडले आहे; मात्र  कर्जमाफी अर्जांच्या चावडी वाचनासाठी ग्रामपंचायत  निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण नसावी, त्यामुळे  यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात  आल्याचे ते म्हणाले.कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे शेतकरी इत्यादी  मुद्यांचा आढावा घेण्यासाठी विदर्भातील ११ जिल्हय़ांचा दौरा  अकोल्यापासून सुरू केल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे सहायक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी  आमदार संजय गावंडे, अँड. अनिल काळे उपस्थित होते.

किमान एका शेतकर्‍याचा सात-बारा कोरा झाला पाहिजे!कर्जमाफी योजनेत किमान एक शेतकर्‍याचा सात-बारा कोरा  झाला पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह असल्याचे दिवाकर राव ते यांनी सांगितले. एका शेतकरी कुटुंबात पतीकडे एक लाख रु पये आणि पत्नीकडे ८0 हजार रुपये कर्ज आहे, अशा शेतकरी  कुटुंबाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला  पाहिजे, असे उदाहरणही रावते यांनी यावेळी दिले.