शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या चार सभांमधील सर्व विषय विखंडित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:30 IST

सर्वसाधारण सभांमध्ये मनमानीरित्या विषय सूचीवरील विषयांना मंजुरी दिल्याचा आराेप विराेधी पक्ष शिवसेना व काॅंग्रेसकडून केला जात आहे. जिल्हा नियोजन ...

सर्वसाधारण सभांमध्ये मनमानीरित्या विषय सूचीवरील विषयांना मंजुरी दिल्याचा आराेप विराेधी पक्ष शिवसेना व काॅंग्रेसकडून केला जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ३० सप्टेंबर रोजीच्या सभेत २ जुलै रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावावर चर्चा करण्याची मागणी सेना व काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी सातत्याने लावून धरली हाेती. तसेच याव्यतिरिक्त ३० सप्टेंबर व २९ ऑक्टाेबर राेजीच्या सभेतही चर्चा न करता महापाैर अर्चना मसने यांनी विषयांना मंजुरी देण्यावर सेना, काॅंग्रेसचा आक्षेप हाेता. त्यावेळी ३० सप्टेंबर राेजीच्या सभेतील सर्व ठराव विखंडित करण्याची मागणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे करण्यात आली हाेती. त्यावर यासंदर्भात लेखी तक्रार दिल्यास कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले हाेते. दाेन महिने उलटून गेल्यावरही आयुक्त ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवित नसल्याचे पाहून सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी शासनाकडे तक्रारी केल्या हाेत्या. शासनाने सदर प्रकरणी चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, अमरावती यांना दिले. विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी शासनाकडे चाैकशी अहवाल सादर केला. त्यावर कारवाई हाेत नसल्याचे पाहून ३ डिसेंबर राेजी सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी थेट मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार नाेंदवली आहे.

...तर आयुक्तांच्या अडचणीत वाढ

सभागृहात सत्तापक्षाने विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. तसे हाेत नसेल तर प्रशासकीय अधिकारी या नात्याने आयुक्तांना मत मांडण्याचा अधिकार आहे. सेनेने तक्रारी केलेल्या सभांमध्ये आयुक्तांनी नेमके काय नमूद केले, याची शहानिशा केली जाणार आहे. सभेच्या इतिवृत्तात आयुक्तांचे मत नमूद नसल्यास त्यांच्या अडचणीत वाढ हाेण्याची शक्यता आहे.