शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही बुडाले मूग, उडदाचे पीक; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST

संतोष येलकर............ अकोला: पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५ टक्के आणि ...

संतोष येलकर............

अकोला: पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५ टक्के आणि उडीद पिकाची ४३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पेरणीनंतर उगवलेली पिकेही पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग आणि उडदाचे पीक बुडाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील मूग पेरणीचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६३७ हेक्टर आणि उडीद पेरणीचे सरासरी क्षेत्र १६ हजार ६५२ हेक्टर आहे. ६५ दिवसांत काढणीला येणाऱ्या पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करता येते, परंतु यंदाच्या पावसाळ्यात १५ जूननंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाची पेरणी रखडली. त्यामुळे ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत मूग पिकाची केवळ ४५.४ टक्के आणि उडीद पिकाची केवळ ४३.८ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. गतवर्षीच्या खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात हाताशी आलेले मूग व उडदाचे पीक बुडाले होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्हयातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची पेरणी होऊ शकली नाही आणि उगवलेल्या पिकांचेही खरे नसल्याच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात मूग व उडदाचे पीक बुडाल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

मूग व उडीद पेरणीचे असे आहे वास्तव! (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र पेरणीचे क्षेत्र टक्केवारी

मूग २२६३७ १०२६९ ४५.४

उडीद १६६५२ ७२९५ ४३.८

कपाशीच्या पेऱ्यातही होणार घट;

सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढणार!

पावसाने दांडी मारल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यातही घट होणार आहे. जिल्ह्यात कपाशी पेरणीचे सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ६८७ हेक्टर इतके असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ ६२ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत कपाशी पिकाची पेरणी करता येणार असून, गत दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कपाशीची पेरणी सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु पेरणीचा कालावधी उलटून जात असल्याने, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कपाशीची पेरणी कमी होणार असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

पावसात खंड पडल्याने मूग व उडीद या पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे, तसेच सरासरीच्या तुलनेत कपाशी पेरणीच्या क्षेत्रातही घट होऊ शकते. पाऊस सुरू झाल्याने रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.