शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:14 IST

बाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी २४ हजार १0१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

ठळक मुद्दे२४ हजार १0१ मतदार बजावणार मतदानाचा हक्कमतदान केंद्रांवर ईव्हीएम, मतदान साहित्यासह पथके रवाना पोलीस बंदोबस्त वाढविला!

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २७ सरपंच पदापैकी तीन सरपंच अविरोध निवडून आले, तर २0५ सदस्यांपैकी ७५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. तालुक्यात १३0 जागांसाठी ३0८ उमेदवार तर सरपंच पदाच्या २४ जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी २४ हजार १0१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी पाच ठिकाणी सरळ लढत आहे, तर कोळासा येथे सात सदस्य अविरोध तर दोन जागा रिक्त असताना फक्त सरपंच पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रा.पं. जोगलखेड सरपंच पदासाठी चार तर सात सदस्य पदासाठी १७ उमेदवार, कारंजा (रमजानपूर) सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, बहादुरा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी तीन अविरोध आणि तीन जागा रिक्त तर एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात, टाकळी खोजबोळ सरपंच पदासाठी तीन तर सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, मनारखेड सरपंच पदासाठी तीन तर नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, कळंबा बु. सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात, कळंबी (महागाव) सरपंच पदासाठी चार तर नऊ जागांसाठी दोन अविरोध व चार जागा रिक्त तर तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, हिंगणा निंबा सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी दोन अविरोध व पाच रिक्त, निंबी सरपंच व सहा सदस्य अविरोध आणि एक जागा रिक्त, भरतपूर सरपंच पदासाठी तीन तर नऊ सदस्यांसाठी तीन अविरोध आणि सहा जागांसाठी १२ उमेदवार सरळ लढतीत, कुपटा सरपंच पदासाठी पाच तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी ११ उमेदवार, सांगवी (जोमदेव) सरपंच पदासाठी दोन तर सात सदस्यांसाठी दोन अविरोध आणि पाच जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात, तामशी सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी चार अविरोध आणि तीन रिक्त तर केवळ सरपंच पदासाठी मतदान, बारलिंगा सरपंच पदासाठी दोन तर सात जागांसाठी १४ उमेदवार सरळ लढत, दधम सरपंच पदासाठी चार तर सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात, शेळद सरपंच पदासाठी पाच तर नऊ जागांसाठी चार अविरोध, पाच जागांसाठी ११ रिंगणात, सातरगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांसाठी चार अविरोध, तीन रिक्त तर केवळ सरपंचासाठी निवडणूक, वझेगाव सरपंच पदासाठी पाच तर सात जागांपैकी दोन अविरोध, पाच जागांसाठी १३ उमेदवार, नागद सरपंच पदासाठी चार तर नऊपैकी चार अविरोध पाच जागांसाठी १0 उमेदवार, मोखा सरपंच पदासाठी तीन तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध, चार जागांसाठी आठ उमेदवार, हसनापूर सरपंच पदासाठी दोन सरळ लढत, सातपैकी सहा अविरोध एका जागेसाठी दोन उमेदवार, मोरगाव (सादीजन) सरपंच अविरोध तर ऊ सदस्यांसाठी सहा अविरोध तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात, मोरझाडी सरपंच पदासाठी चार तर सात सदस्यांपैकी तीन अविरोध चार सदस्यांसाठी नऊ उमेदवार रिंगणात, निमकर्दा सरपंच पदासाठी पाच तर नऊ सदस्यांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७३ केंद्राध्यक्ष व एकूण २२0 कर्मचारी आज मतदान केंद्रावर मतदारांकडून मतदान करून घेतील. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे, निवडणूक नायब तहसीलदार ए.एस. सोनवणे व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.व्ही. दुधे, जे.आर. तिवारी, योगेश कौटकर, अरुण मुंदडा, श्रीधर बोकडे, एम.एस. राऊत, प्रदीप चोरे तर सहा. निवडणूक अधिकारी डी.डी. मानकर, सुभाष ठाकरे, एस.वाय. उमाळे, ए.एस. साखरकर, आर. बी. सावदेकर, सुरेश पवार, प्रकाश हिरुळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

पाच गटग्रामपंचायतींसाठी दूरचे मतदान केंद्र - पाच गटग्रामपंचायतींमध्ये शेळद, टाकळी निमकर्दा, जोगलखेड, हसनापूर व कुपटा या गावाला २ ते ३ गावे जोडली आहेत. निवडणूक केंद्र ग्रामपंचायत मुख्यालय (मतदान केंद्राचे अंतर) हे एक कि.मी.च्या आत असावे, असे असताना मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्राची सुविधा देण्यात आली नसल्याचे चित्र आहे. शेळद ग्रामपंचायतीमध्ये अकोला नाका हे अंतर पाच कि.मी. आहे. - टाकळी निमकर्दाला बोराळा, बोरवाकळी, मनाडी या गावाला मतदान केंद्र नाही. या तिन्ही गावांच्या मतदारांना टाकळी निमकर्दा येथे ३.५ कि.मी. अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. जोगलखेड, सोनगिरी, अडोशी, धानोरा या तिन्ही गावांच्या मतदारांना तीन कि.मी.पेक्षा जास्त अंतरावरून मतदानासाठी जावे लागणार आहे. - याबाबत मतदार व उमेदवार राजकीय पक्षाने निवडणूक विभागाकडे ना तक्रार केली, ना सुचवले. निवडणूक विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पर्यायाने मतदारांना उमेदवारांच्या वाहनाचा सहारा घ्यावा लागणार आहे.