शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

अकोला: कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले असून, कोरोनामुळे दोन्ही ...

अकोला: कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आले असून, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी संबंधित बालकांचा शोध घेऊन जिल्हा बाल कल्याण समिती किंवा संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे माहिती देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी केले.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सदस्य सचिव राजेश देशमुख, चाइल्ड लाइन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ.सुनील मानकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, संगीता ठाकूर, सुनील सरकटे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनबाधित रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते, तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होऊ नये, यासाठी त्यांचे संरक्षण व पालनपोषण व्हावे, याकरिता अधिनियमान्वये जिल्हास्तरीय कृती दल ९ मे रोजी गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे.

आई किंवा वडील, तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास, अशा १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाल कल्याण समितीमार्फत अशा बालकांचे बालगृहांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून, जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळून आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधावा किंवा बालकांचे हितचिंतक या नात्याने चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले.