शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

पाणीटंचाई कृती आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST

अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी ...

अकोला: जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक बोलावली आहे.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत या कालावधीकरिता पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांची बैठक बोलावली आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आराखड्यात २५ गावांसाठी

३६ उपाययोजना प्रस्तावित!

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २५ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या ३६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.