शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करा!

By admin | Updated: July 15, 2017 02:05 IST

शेतकरी जागर मंचची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनसचा लाभ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २२ हजार ९२७ शेतकरी सोयाबीन बोनससाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे; परंतु सोयाबीन बोनससाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप बोनस रकमेचा लाभ मिळाला नाही. शेतमालाचे पडलेले भाव, निसर्गाची अवकृपा आणि कर्जमाफीचे मृगजळ यामुळे मेटाकुटीस आला असताना गतवर्षी सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने सोयाबीन बोनस वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, रंगराव टेके, शिवाजी म्हैसने, दिलीप मोहोड, सैय्यद वासीफ, दीपक गावंडे, सैय्यद अजीज, प्रमोद गायकवाड, महादेवराव वानखडे, अनिल ठेकेदार, शेख अन्सार, श्रीकृष्ण माळी, कैलास विरोकार, बलदेवराव पळसपगार उपस्थित होते.१९ जुलैपर्यंत बोनस द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!जिल्ह्यातील सोयाबीन विकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ जुलैपर्यंत बोनस वितरित करण्यात यावे अन्यथा शेतकरी जागर मंच आक्रमक भूमिका घेणार असून, तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकरी जागर मंचने दिला आहे.