शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करा!

By admin | Updated: July 15, 2017 02:05 IST

शेतकरी जागर मंचची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनसचा लाभ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे ‘बोनस’ तातडीने वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे बोनस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २२ हजार ९२७ शेतकरी सोयाबीन बोनससाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव संबंधित यंत्रणेमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे; परंतु सोयाबीन बोनससाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप बोनस रकमेचा लाभ मिळाला नाही. शेतमालाचे पडलेले भाव, निसर्गाची अवकृपा आणि कर्जमाफीचे मृगजळ यामुळे मेटाकुटीस आला असताना गतवर्षी सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने सोयाबीन बोनस वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी जागर मंंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर सुलताने, रंगराव टेके, शिवाजी म्हैसने, दिलीप मोहोड, सैय्यद वासीफ, दीपक गावंडे, सैय्यद अजीज, प्रमोद गायकवाड, महादेवराव वानखडे, अनिल ठेकेदार, शेख अन्सार, श्रीकृष्ण माळी, कैलास विरोकार, बलदेवराव पळसपगार उपस्थित होते.१९ जुलैपर्यंत बोनस द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!जिल्ह्यातील सोयाबीन विकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९ जुलैपर्यंत बोनस वितरित करण्यात यावे अन्यथा शेतकरी जागर मंच आक्रमक भूमिका घेणार असून, तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकरी जागर मंचने दिला आहे.