शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

धान्य वाटपाच्या वेळापत्रकाला २५ जिल्ह्यांत ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:05 IST

२५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही.

- सदानंद सिरसाटअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला अन्न सुरक्षा दिनानिमित्त प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही. वाटपाला विलंबामुळे धान्याचा काळाबाजार करण्यालाच त्यातून प्रोत्साहन देण्याचा प्रकार राज्यभरात घडत आहे. विशेष म्हणजे, पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सहा महसूल विभागातील पुरवठा उपायुक्तांना धारेवर धरले आहे.शासनाने २०१२ पासून अन्न दिन व अन्न सप्ताह पाळणे सुरू केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार तशी व्यवस्था निर्माण करणे शासनाला बंधनकारक आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ मे २०१८ रोजी विशेष आदेशही देण्यात आला. त्यामध्ये पुढील महिन्याचे धान्य नियतन आधीच्या महिन्यात १० तारखेपर्यंत प्राप्त करणे, उचल करणे, २० तारखेपर्यंत ते धान्य गोदामात पोहोचणे, तालुक्यातील पुरवठा विभागाने २० तारखेपर्यंत दुकानदारांना परमिट देणे, २१ तारखेपासून दुकानापर्यंत धान्य वाहतूक सुरू करणे, १४ तारखेपर्यंत रास्त भाव दुकानापर्यंत १०० टक्के धान्य पुरवठा करणे, अन्न दिनाच्या दिवशी दरमहा ७ तारखेला व त्यानंतर १५ तारखेपर्यंत लाभार्थींसाठी दुकानात धान्य उपलब्ध करणे, ही पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धत निश्चित झाली. या पद्धतीला यंत्रणेतूनच सुरुंग लावत लाभार्थींचे धान्य काळ्या बाजारात जाण्याचा रस्ता मोकळा केला जात आहे.पुरवठा साखळी व्यवस्थापन पद्धतीनुसार १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कमालीची दिरंगाई झाली आहे. काही जिल्ह्यांतील वाटपाची टक्केवारी २० च्या पुढेही गेलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील धान्य वाटपात सुरू असलेल्या गोंधळाची गंभीर दखल पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी घेतली. अमरावती विभागाचे उपायुक्त रमेश मावसकर यांना त्याबाबतचे पत्र देत सुधारणा करण्याचे बजावले. तसे न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

वेळेत शंभर टक्के वाटप न करणारे जिल्हेसिंधुदुर्ग-६३, ठाणे-७३, रायगड-७६, नंदूरबार-६१, जळगाव-६७, नाशिक-७४, हिंगोली-२०, बीड-७३, नांदेड-६३, जालना-७२, परभणी-४९, अमरावती-६३, बुलडाणा-१९, औरंगाबाद-८६, धुळे-८५, पालघर-८७, रत्नागिरी-९१, यवतमाळ-९०, गोंदिया-८९, गडचिरोली-९२ टक्के एवढे धान्य वेळेत पुरवठा झाले.

 

टॅग्स :Akolaअकोला