शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य वाटपाच्या वेळापत्रकाला २५ जिल्ह्यांत ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:05 IST

२५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही.

- सदानंद सिरसाटअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला अन्न सुरक्षा दिनानिमित्त प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शासनाने पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धतीनुसार ठरवून दिलेले वेळापत्रक पाळले जात नाही. वाटपाला विलंबामुळे धान्याचा काळाबाजार करण्यालाच त्यातून प्रोत्साहन देण्याचा प्रकार राज्यभरात घडत आहे. विशेष म्हणजे, पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सहा महसूल विभागातील पुरवठा उपायुक्तांना धारेवर धरले आहे.शासनाने २०१२ पासून अन्न दिन व अन्न सप्ताह पाळणे सुरू केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार तशी व्यवस्था निर्माण करणे शासनाला बंधनकारक आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी १८ मे २०१८ रोजी विशेष आदेशही देण्यात आला. त्यामध्ये पुढील महिन्याचे धान्य नियतन आधीच्या महिन्यात १० तारखेपर्यंत प्राप्त करणे, उचल करणे, २० तारखेपर्यंत ते धान्य गोदामात पोहोचणे, तालुक्यातील पुरवठा विभागाने २० तारखेपर्यंत दुकानदारांना परमिट देणे, २१ तारखेपासून दुकानापर्यंत धान्य वाहतूक सुरू करणे, १४ तारखेपर्यंत रास्त भाव दुकानापर्यंत १०० टक्के धान्य पुरवठा करणे, अन्न दिनाच्या दिवशी दरमहा ७ तारखेला व त्यानंतर १५ तारखेपर्यंत लाभार्थींसाठी दुकानात धान्य उपलब्ध करणे, ही पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम) पद्धत निश्चित झाली. या पद्धतीला यंत्रणेतूनच सुरुंग लावत लाभार्थींचे धान्य काळ्या बाजारात जाण्याचा रस्ता मोकळा केला जात आहे.पुरवठा साखळी व्यवस्थापन पद्धतीनुसार १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कमालीची दिरंगाई झाली आहे. काही जिल्ह्यांतील वाटपाची टक्केवारी २० च्या पुढेही गेलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील धान्य वाटपात सुरू असलेल्या गोंधळाची गंभीर दखल पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी घेतली. अमरावती विभागाचे उपायुक्त रमेश मावसकर यांना त्याबाबतचे पत्र देत सुधारणा करण्याचे बजावले. तसे न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.

वेळेत शंभर टक्के वाटप न करणारे जिल्हेसिंधुदुर्ग-६३, ठाणे-७३, रायगड-७६, नंदूरबार-६१, जळगाव-६७, नाशिक-७४, हिंगोली-२०, बीड-७३, नांदेड-६३, जालना-७२, परभणी-४९, अमरावती-६३, बुलडाणा-१९, औरंगाबाद-८६, धुळे-८५, पालघर-८७, रत्नागिरी-९१, यवतमाळ-९०, गोंदिया-८९, गडचिरोली-९२ टक्के एवढे धान्य वेळेत पुरवठा झाले.

 

टॅग्स :Akolaअकोला