शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मार्गावर खड्डय़ांचे ‘विघ्न’

By admin | Updated: September 1, 2014 20:02 IST

आकोटात हजारो खड्डय़ांचे अडथळे

आकोट: संवेदनशील आकोट शहरात गणरायाच्या मिरवणूक मार्गावर खड्डय़ांचे विघ्न निर्माण झाले आहे. अशा स्थितीत चंद्रावरच मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव गणराया सोबतच भक्तांना येणार आहे. शहारातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्ते हजारो खड्डय़ांनी व्यापले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वाढत आहे. या चाळणी झालेल्या मार्गावरील खड्डय़ांमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार असल्याचे दिसते. त्यामुळे वेळप्रसंगी भविष्यातील घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.विविध प्रभाग व कॉलनीतील गणपती विर्सजनाकरिता रांगेत लागण्याकरिता येतात; परंतु अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे गणरायांच्या आगमन मार्गावर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील जवाहर मार्ग, अकोला मार्ग, अंजनगाव मार्ग, मच्छीसाथ, शिवाजी चौक, सोनू चौक, नया प्रेस, शौकत अली चौक, याकुब चौक, बारगण तसेच इतर शहरातील अंतर्गत रस्त्यामधील खड्डय़ातून वाट काढावी लागत आहे. शहरात ८८ गणपती मंडळाची स्थापना झाली आहे. विविध मोहल्ल्यांमधून मिरवणूक काढली जाणार आहे. शहरात आधीच रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. शिवाय रस्त्यावर रेती, शेणखताचे ढिगारे साचले आहेत. विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे अंधारात खड्डे दिसून येत नसल्याने कसरत करावी लागणार आहे. सोनू चौकासह इतर चौकामधील नालीवर टाकलेल्या लोखंडी जाळय़ा उखळल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. शिवाय रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बिकट प्रसंग ओढावत आहे. पावसाळय़ांचे दिवस असल्याने खड्डे पाण्याचे डबके झाले आहेत. पाणी भरल्याने रस्ते दुरुस्तीमध्ये अडचणी येणार आहेत. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने खड्डे पाण्याने भरले आहेत. काही भागात तर रस्ते पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्ता शोधत मार्ग काढावा लागत आहे. भविष्यातील उत्सव पाहता पावसाळय़ापूर्वीच खड्डे डाबंरीकरणाने बुजविणे आवश्यक होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांच्या व्यवस्थेकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे; परंतु मिरवणूक उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, यांची दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.