शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मार्गावर खड्डय़ांचे ‘विघ्न’

By admin | Updated: September 1, 2014 20:02 IST

आकोटात हजारो खड्डय़ांचे अडथळे

आकोट: संवेदनशील आकोट शहरात गणरायाच्या मिरवणूक मार्गावर खड्डय़ांचे विघ्न निर्माण झाले आहे. अशा स्थितीत चंद्रावरच मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव गणराया सोबतच भक्तांना येणार आहे. शहारातील मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्ते हजारो खड्डय़ांनी व्यापले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वाढत आहे. या चाळणी झालेल्या मार्गावरील खड्डय़ांमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार असल्याचे दिसते. त्यामुळे वेळप्रसंगी भविष्यातील घटना पाहता कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.विविध प्रभाग व कॉलनीतील गणपती विर्सजनाकरिता रांगेत लागण्याकरिता येतात; परंतु अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे गणरायांच्या आगमन मार्गावर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील जवाहर मार्ग, अकोला मार्ग, अंजनगाव मार्ग, मच्छीसाथ, शिवाजी चौक, सोनू चौक, नया प्रेस, शौकत अली चौक, याकुब चौक, बारगण तसेच इतर शहरातील अंतर्गत रस्त्यामधील खड्डय़ातून वाट काढावी लागत आहे. शहरात ८८ गणपती मंडळाची स्थापना झाली आहे. विविध मोहल्ल्यांमधून मिरवणूक काढली जाणार आहे. शहरात आधीच रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. शिवाय रस्त्यावर रेती, शेणखताचे ढिगारे साचले आहेत. विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे अंधारात खड्डे दिसून येत नसल्याने कसरत करावी लागणार आहे. सोनू चौकासह इतर चौकामधील नालीवर टाकलेल्या लोखंडी जाळय़ा उखळल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहे. शिवाय रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बिकट प्रसंग ओढावत आहे. पावसाळय़ांचे दिवस असल्याने खड्डे पाण्याचे डबके झाले आहेत. पाणी भरल्याने रस्ते दुरुस्तीमध्ये अडचणी येणार आहेत. सध्या पावसाळय़ाचे दिवस असल्याने खड्डे पाण्याने भरले आहेत. काही भागात तर रस्ते पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्ता शोधत मार्ग काढावा लागत आहे. भविष्यातील उत्सव पाहता पावसाळय़ापूर्वीच खड्डे डाबंरीकरणाने बुजविणे आवश्यक होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांच्या व्यवस्थेकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे; परंतु मिरवणूक उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, यांची दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.