शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

४00 उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 02:04 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा सादर केला नाही खर्च; शुक्रवारपासून सुनावणी होणार.

संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी निवडणूक खर्च सादर न करणार्‍या जिल्ह्यातील ३९१ उमेदवारांवर पाच वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या असून, शुक्रवार, ३ जूनपासून जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.गतवर्षी ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्यात निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च संबंधित तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु, वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक लढविलेल्या ३९१ उमेदवारांकडून निवडणुकीचा खर्च सादर करण्यात आला नसल्याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. तर तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत अद्याप सादर करण्यात आला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याने, संबंधित उमेदवारांवर पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या उमेदवारांची सुनावणी ३ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात आकोट तालुक्यातील २0 आणि पातूर तालुक्यातील ३५ उमेदवारांची सुनावणी ३ जून रोजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे घेण्यात येणार आहे.