शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हा परिषदेत निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:48 IST

जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांची बदली करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करणे बंधनकारक आहे; मात्र अकोला जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रक्रियेशी थेट संबंध असलेल्या महसूल, ग्रामविकास, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध निकष लावले. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत बदल्या करण्याची मुदतही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने केल्या. त्यामध्ये जवळपास २१ अधिकारी आहेत. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांची अमरावती जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन विभागात त्याच पदावर बदली झाली. काही महिन्यांपूर्वी कुळकर्णी यांची वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर बदली झाली होती. तेथे ते रुजू झाले नाहीत. त्यानंतर अकोला जिल्हा परिषदेतच जुलै २०१४ पासून कार्यरत असल्याने त्यांची बदली झाली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अकोला जिल्हा परिषदेतून तत्काळ कार्यमुक्त होऊन रुजू होणे आवश्यक होते; मात्र १५ दिवस उलटले. निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. तरीही ते कार्यमुक्त न झाल्याने आयोगाच्या निर्देशालाच धाब्यावर बसविण्याचा प्रकार घडत आहे. त्याचवेळी कुळकर्णी यांच्या बदलीने रिक्त होणाºया पदावर कोणाला देण्यात आले नाही. त्यांना पर्यायी अधिकारी नसल्याने कार्यमुक्त न करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला.- बदलीचा आदेश आयोगाकडेआयोगाच्या निर्देशानुसार, जे अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेशी निगडित आहेत, त्यामध्ये एखाद्या अधिकाºयाची सेवा चार वर्षांतील सलग तीन वर्षे झाली असल्यास त्याची बदली करणे, ३१ मे २०१९ पर्यंत संबंधित जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण होणाऱ्यांचीही बदली जिल्ह्याबाहेर करण्याचे आयोगाने बजावले होते. अधिकाºयांच्या बदल्यामध्ये राजकीय प्रभाव पडणार नाही, यासाठी आयोगाला बदल्यांचा आदेशही सादर करण्यात आला. त्या आदेशानंतरही कुळकर्णी कार्यरत आहेत, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद