शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 14:48 IST

जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्यांची बदली करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करणे बंधनकारक आहे; मात्र अकोला जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रक्रियेशी थेट संबंध असलेल्या महसूल, ग्रामविकास, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध निकष लावले. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत बदल्या करण्याची मुदतही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने केल्या. त्यामध्ये जवळपास २१ अधिकारी आहेत. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांची अमरावती जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन विभागात त्याच पदावर बदली झाली. काही महिन्यांपूर्वी कुळकर्णी यांची वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर बदली झाली होती. तेथे ते रुजू झाले नाहीत. त्यानंतर अकोला जिल्हा परिषदेतच जुलै २०१४ पासून कार्यरत असल्याने त्यांची बदली झाली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अकोला जिल्हा परिषदेतून तत्काळ कार्यमुक्त होऊन रुजू होणे आवश्यक होते; मात्र १५ दिवस उलटले. निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. तरीही ते कार्यमुक्त न झाल्याने आयोगाच्या निर्देशालाच धाब्यावर बसविण्याचा प्रकार घडत आहे. त्याचवेळी कुळकर्णी यांच्या बदलीने रिक्त होणाºया पदावर कोणाला देण्यात आले नाही. त्यांना पर्यायी अधिकारी नसल्याने कार्यमुक्त न करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला.- बदलीचा आदेश आयोगाकडेआयोगाच्या निर्देशानुसार, जे अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेशी निगडित आहेत, त्यामध्ये एखाद्या अधिकाºयाची सेवा चार वर्षांतील सलग तीन वर्षे झाली असल्यास त्याची बदली करणे, ३१ मे २०१९ पर्यंत संबंधित जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण होणाऱ्यांचीही बदली जिल्ह्याबाहेर करण्याचे आयोगाने बजावले होते. अधिकाºयांच्या बदल्यामध्ये राजकीय प्रभाव पडणार नाही, यासाठी आयोगाला बदल्यांचा आदेशही सादर करण्यात आला. त्या आदेशानंतरही कुळकर्णी कार्यरत आहेत, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद