शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जात पडताळणी समित्या बरखास्त करा! -  आमदार रणधीर सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:55 IST

अकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विद्यार्थी व नागरिकांसाठी त्रासदायक व डोकेदुखी ठरत असल्याने, राज्यातील जात पडताळणी समित्या बरखास्त करण्यात याव्या, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे शनिवारी केली.राज्यातील मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी जात पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या होत्या; परंतु या समित्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळण्याऐवजी त्रासदायक व डोकेदुखी ठरत आहे. तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.देशातील इतर राज्यात जात पडताळणी समित्या अस्तित्वात नसताना राज्यातही या समित्या नसाव्या, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षात विद्यार्थी व मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आपण अनेकदा जात पडताळणी कार्यालय गाठले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला; परंतु जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुधारणा होत नाही.कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी व समिती अध्यक्ष नसणे अशी अनेक कारणे सांगून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र असल्याचे चित्र असून, नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जात पडताळणीची कामे पूर्वीप्रमाणे महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (महसूल) सोपविण्यात यावी, अशी मागणीही आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाRandhir Savarkarरणधीर सावरकर