शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शाळा तपासणीसाठीच्या त्रयस्थ समित्या बरखास्त

By admin | Updated: March 18, 2015 23:25 IST

शिक्षण विभागाचा निर्णय.

अकोला - अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळांची पुनर्तपासणी करण्यासाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या शिक्षण विभागाने मंगळवारी बरखास्त केल्या. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित शाळांना अनुदान तत्त्वावर आणण्यासाठी राज्य शासनाच्याच आदेशानंतर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी शाळांची तपासणी करून त्याचे अहवाल शिक्षण उपसंचालकांमार्फत शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले होते. मात्र, यामध्ये काही अधिकार्‍यांच्या तपासणीवरच आक्षेप घेण्यात आल्याने शिक्षण विभागाने या शाळांची फेरतपासणी करण्यासाठी त्रयस्थ समित्या नेमून तपासणी सुरू केली होती. या प्रकारामुळे शिक्षण विभागातीलच अधिकार्‍यांवर शिक्षण विभागाचाच विश्‍वास नसल्याचे समोर आल्याने. तसेच समित्यांची तपासणी रात्री, अवेळी सुरू होत असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचार्‍यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर अधिवेशनात या समित्या बरखास्त करण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावेळी शासनाने या विषयाला बगल दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही आ. देशपांडे यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी या समित्या लवकरच बरखास्त करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी मंगळवारी शाळा तपासणीसाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विनाअनुदान तत्त्वावरील शाळांना अनुदान देण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांनी तपासणी करून आधीच अहवाल सादर केले आहेत. मात्र त्यानंतर त्रयस्थ समितीकडून तपासणी करण्यात येत असल्याने शिक्षण विभागातील अधिकार्‍यांवरच संशय निर्माण करण्यात आला होता. नागपूर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या समित्या बरखास्त करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*दोनवेळा घोषणेनंतरही तपासणी सुरूच

    शाळा तपासणीसाठी नेमलेल्या त्रयस्थ समित्या बरखास्त करण्याची घोषणा शिक्षणमंत्री तावडे यांनी दोनवेळा केली होती; मात्र त्यानंतरही या समित्यांकडून शाळा तपासणीचे कामकाज सुरूच होते. हा मुद्दा आ. श्रीकांत देशपांडे यांनी पुन्हा लावून धरल्यानंतर मंगळवारी या समित्या बरखास्त करण्यात आल्या.