शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या गोंधळाने शेतकर्‍यांमध्ये असंतोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:36 IST

अकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला. 

ठळक मुद्देशंकरअण्णा धोंडगे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला. शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; परंतु कर्जमाफीच्या घोषणेनंतर यासंदर्भात वारंवार निकष व निर्णय बदलण्यात येत असल्याच्या गोंधळामुळे २0 टक्के शेतकर्‍यांनाही या कर्जमाफीचा लाभ होण्याची चिन्हे नसल्याने, विदर्भासह राज्यभरात शेतकर्‍यांमध्ये असंतोषाची भावना पसरली असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला. गत तीन वर्षांपासून राज्यातील शेतकरी व शेतमजूर दुष्काळ, नापिकी तसेच शेतमालाचे कमी झालेले भाव , नोटाबंदी व इतर कारणांमुळे शेतकरी-शेतमजूर त्रस्त झाला आहे, असे सांगत आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांसह ग्रामीण जनतेचे अर्थकारण मोडीत निघाले असून, शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले सोयाबीन व भात पिकाचे अनुदान दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतीच्या विविध प्रश्नांवर शेतकरी समाजाने संघटित लढा उभारण्याची गरज आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी किसान मंचच्यावतीने १ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे, असेही धोंडगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशंत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, सम्राट डोंगरदिवे, सैयद वासीफ , विजय देशमुख, शेख अन्सार, ज्ञानेश्‍वर सुलताने, प्रशांत नागे, मयूर वहिले, राहुल घाटे उपस्थित होते.

कर्जमाफी उपकार नाही! राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा काही उपकार नाही, तर घटनेतील तरतूद आहे, असे सांगत कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असेही शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी सांगितले.

आजपासून जिल्ह्यात संवाद यात्रा!गत १ ऑगस्टपासून सेवाग्राम येथून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत संवादयात्रा  २४ ते २६ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातून जाणार आहे. त्यामध्ये किसान मंच व शेतकरी जगार मंचच्यावतीने कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव, यासह शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.