शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

परिचर्चा : ऑनलाइन बदली प्रक्रियेतील गोंधळ दूर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:10 IST

या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या परिचर्चेत व्यक्त केली.

अकोला: जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी सुधारित धोरण निश्चित केले. त्या धोरणामुळे राज्यातील शिक्षकांना अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या दूर करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला असून, त्या गटाने या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या परिचर्चेत व्यक्त केली.

बदली अधिनियम २००६ नुसार टक्केवारी ठरवावी, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपसी बदलीचा विकल्प द्यावा, पती-पत्नी यांना एक युनिट समजून बदली करू नये, दोनपैकी एक बदलीपात्र असल्यास बदलीपात्र नसणाºया शिक्षकाच्या ठिकाणाहून ३० किमीच्या आत प्राधान्याने बदली द्यावी, क्षयरोग, गंभीर आजार, स्तनदा, गर्भवती मातांसह त्यांच्या जोडीदारांना संवर्ग-१ चा दर्जा द्यावा, विकल्पांची संख्या कमी करावी, अपवादात्मक स्थितीत सीईओ, बीडीओ यांना अधिकार द्यावे.- देवानंद मोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना.

आॅनलाइन बदली प्रक्रिया चांगली आहे. ती पुढेही सुरू राहावी, त्यामध्ये संवर्ग-१ व २ करिता बदलीसाठी निश्चित कालावधी असावा, त्यांच्यासाठी बदल्यांची टक्केवारी निश्चित करावी, त्या संवर्गातील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी बदल्यांपूर्वी करावी, संवर्गनिहाय बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, संवर्ग-१ नंतर रिक्त पदे दाखवून त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी, त्यामुळे संवर्ग-४ मधील शिक्षकांना रिक्त पदांची माहिती मिळेल.- प्रकाश चतरकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.आॅनलाइन बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना द्यावे, आॅनलाइन बदल्यांना शिक्षक समितीचा विरोध नाही. प्रक्रिया राबविताना तालुका स्तर, जिल्हा स्तर ठरवून शेकडा काही प्रमाणात बदल्या कराव्या, दरवर्षी प्रक्रिया राबविणे अयोग्य आहे. त्यामुळे शिक्षकांना स्थैर्य लाभणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणार नाही. संवर्गनिहाय रिक्त जागा व प्रमाण ठरवावे, स्वराज्य संस्थांना अधिकार द्यावे.- मारोती वरोकार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.अवघड व सर्वसाधारण भागाचा पुन्हा विचार करावा, अवघड क्षेत्रातील शिक्षकांना पुन्हा बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रम द्यावा, बदली झालेल्या शिक्षकाची पाच वर्षे बदली होऊ नये, संवर्ग-१ चा लाभ देण्याआधी कागदपत्रांची तपासणी करावी, पती-पत्नी कार्यरत असल्यास बदली प्रक्रियेत ३० किमीपेक्षा अधिक अंतरावर बदली करू नये, जे २० किमीच्या आत आहेत, ते बदलीपात्र समजण्यात येऊ नये, विनंती बदली अर्जानुसार १० टक्के कराव्या.- अमर गजभिये, प्रसिद्धिप्रमुख जिल्हा कास्ट्राइब शिक्षक संघटना.बदल्यांची टक्केवारी ठरायलाच हवी, जिल्हांतर्गत बदलीसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करावे, ती प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे द्यावी, मोघम मुद्यावर अवघड क्षेत्र निश्चित केल्यामुळे अनेक गावे त्या क्षेत्रात समाविष्ट झाली नाहीत. एका संवर्गातील शिक्षकाला मिळालेली शाळा ब्लॉक करावी, त्यामुळे पुढील संवर्गातील शिक्षकाचा पर्याय वाया जाणार नाही.- रजनीश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र