शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू

By संतोष येलकर | Updated: October 3, 2023 19:33 IST

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम

अकोला : गेल्या ७५ वर्षांत दिव्यांगांना साधे घरही मिळाले नसल्याचा आरोप करीत, दिव्यांगांना केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करून दिव्यांगांना ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील पोलिस लाॅन येथे आयोजित दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने आमदार किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकूल, निर्वाह भत्ता आदी विविध योजनांच्या अनुदानाचे धनादेश व कृत्रिम अवयवाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी, तर संचालन मनीषा शेजोळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.दिव्यांगाना दरमहा ५ तारखेच्याआत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे !

सरकारकडून अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदारांना वेळेवर पगार दिला जातो; मात्र दिव्यांगांना दरमहा दिले जाणारे अर्थसाहाय्य तीन ते सहा महिने मिळत नाही, असे सांगत दिव्यांगांना दरमहा ५ तारखेच्या आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे बच्चू कडू यांनी यांनी स्पष्ट केले.दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या !घरकूल, अंत्योदय आदी याेजनांचा लाभ मिळाला नसल्याने दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या, अशी मागणी करीत दिव्यांगांना हक्कासाठी लढावे लागेल, असे कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू