शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू

By संतोष येलकर | Updated: October 3, 2023 19:33 IST

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम

अकोला : गेल्या ७५ वर्षांत दिव्यांगांना साधे घरही मिळाले नसल्याचा आरोप करीत, दिव्यांगांना केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करून दिव्यांगांना ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील पोलिस लाॅन येथे आयोजित दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने आमदार किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकूल, निर्वाह भत्ता आदी विविध योजनांच्या अनुदानाचे धनादेश व कृत्रिम अवयवाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी, तर संचालन मनीषा शेजोळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.दिव्यांगाना दरमहा ५ तारखेच्याआत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे !

सरकारकडून अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदारांना वेळेवर पगार दिला जातो; मात्र दिव्यांगांना दरमहा दिले जाणारे अर्थसाहाय्य तीन ते सहा महिने मिळत नाही, असे सांगत दिव्यांगांना दरमहा ५ तारखेच्या आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे बच्चू कडू यांनी यांनी स्पष्ट केले.दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या !घरकूल, अंत्योदय आदी याेजनांचा लाभ मिळाला नसल्याने दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या, अशी मागणी करीत दिव्यांगांना हक्कासाठी लढावे लागेल, असे कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू