शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू

By संतोष येलकर | Updated: October 3, 2023 19:33 IST

दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम

अकोला : गेल्या ७५ वर्षांत दिव्यांगांना साधे घरही मिळाले नसल्याचा आरोप करीत, दिव्यांगांना केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करून दिव्यांगांना ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील पोलिस लाॅन येथे आयोजित दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने आमदार किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकूल, निर्वाह भत्ता आदी विविध योजनांच्या अनुदानाचे धनादेश व कृत्रिम अवयवाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी, तर संचालन मनीषा शेजोळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.दिव्यांगाना दरमहा ५ तारखेच्याआत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे !

सरकारकडून अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदारांना वेळेवर पगार दिला जातो; मात्र दिव्यांगांना दरमहा दिले जाणारे अर्थसाहाय्य तीन ते सहा महिने मिळत नाही, असे सांगत दिव्यांगांना दरमहा ५ तारखेच्या आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे बच्चू कडू यांनी यांनी स्पष्ट केले.दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या !घरकूल, अंत्योदय आदी याेजनांचा लाभ मिळाला नसल्याने दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या, अशी मागणी करीत दिव्यांगांना हक्कासाठी लढावे लागेल, असे कडू यांनी सांगितले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू