शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जैन मंदिराच्या तळघरात आढळल्या दिगंबरी मूर्ती !

By admin | Updated: July 13, 2015 01:44 IST

वैशाली वालचाळे यांची पत्रकारपरिषदेत माहीती

शिरपूर जैन (जि. वाशिम) : नित्यनेमानुसार येथील अंतरिक्ष पार्श्‍वनाथ जैन मंदिरात पोलीस बंदोबस्तात दिगंबरी आणि श्‍वेतांबरी पुजारीं पूजेकरिता गेले असता, प्राचीन दिगंबरी खड्गासनस्थ उभ्या आसनातल्या काळ्या पाषाणाच्या सात मूर्ती आढळल्या, अशी माहिती अँड. वैशाली वालचाळे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना अँड. वालचाळे यांनी सांगितले की, १२ जुलै रोजी शिरपूर येथील जैन मंदिरात पोलिस बंदोबस्तात दिगंबरी पंडित अजय व श्‍वेतांबरी पुजारी पूजेसाठी आत गेले असता, अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवतांच्या मूर्तीजवळ त्यांना काळा नाग दिसला. मूर्तीजवळून पुढे हा नाग कोठे जातो, हे पाहण्यासाठी पुजारी अजय दिवा घेऊन त्याच्या मागे गेले असता, तो ज्या कोपर्‍यात गेला, तेथे एक छोटी कपार आढळली. त्या कपारीत अजय गेले असता, तिथे दिव्याच्या उजेडात अडीच ते तीन फूट उंचीच्या चार मूर्ती आढळल्या. यांसह पंचमेरूच्या तीन धातूच्या मूर्ती सापडल्या. यामध्ये पंचबालयती वासुपूज्य, पार्श्‍वनाथ, नेमिनाथ, मल्लीनाथ, महावीर व पदमावती देवी या मूर्त्यांचा सामावेश असल्याचे अँड. वालचाळे यांनी सांगितले. सदर मूर्ती सापडल्यानंतर परिसरातील जैन व इतर बांधव दर्शन घेण्यासाठी शिरपूर येथे आले; मात्र मूर्ती तळघरातील गाभार्‍यामध्ये असल्यामुळे आणि दिगंबरी व श्‍वेतांबरीच्या वादामुळे परिस्थिती ह्यजैसे थेह्ण ठेवण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे कोणालाही मूर्तींचे दर्शन घेता आले नाही. मंदिराचा वाद लवकर सुटावा, याकरिता समाजातील सर्व मुनी महाराज, माताजी, ङ्म्रावक अनुष्ठान विधान नियमितपणे करीत आहेत, त्याचाच प्रत्यय रविवारी आल्याचे अँड. वालचाळे म्हणाल्या. यावेळी योगेश मनाटकर, संजय कान्हेड, रमेश काळे, दिगंबरी पंडित अजय आदी उपस्थित होते. यासंदर्भात येथील पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी अंतरिक्ष पार्श्‍वनाथ मंदिरात दिगंबर व श्‍वेतांबर पुजार्‍यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पार्श्‍वनाथाची पूजा केली असल्याचे स्पष्ट केले. यावेळी दिगंबरी पुजारी पंडित अजय यांनी साप-साप म्हटल्याने ते वगळता इतर जण भीतीपोटी बाजूला सरकले. यावेळी पंडित अजय यांनी मंदिरात अडगळीत पडलेली मुर्ती उचलून बाहेर आणली व पेढीवर ठेवली. त्यावर आतील मूर्ती बाहेर का आणली, असा आक्षेप श्‍वेतांबरी गटाने घेतला. यानंतर दोन्ही गटांमधील सामंजस्याने मूर्ती गाभार्‍यात पूर्वीच्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आली. दिगंबर पंडित अजय यांना असे कृत्य पुन्हा घडणार नाही, अशी समज त्यांना आपण दिली आहे. विज्ञान युगात चमत्काराला थारा नाही. असा कुठलाच चमत्कार याबाबत घडलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.