शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषितांचा आहार रोखला!

By admin | Updated: July 6, 2017 01:04 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा प्रताप

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागाची कमालीची दिरंगाई जिल्ह्यातील कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर महिलांच्या जीवावर उठली आहे. गेल्या तीन वर्षांत कुपोषणाने बाल-माता मृत्यू होऊ नये, यासाठी असलेली पोषण आहार योजना विभागाने राबवलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, याबाबत सभापती देवकाबाई दिनकर पातोंड यांनी महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांना जाब विचारला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक बालके कुपोषित असल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांच्या कुपोषणावर उपाय म्हणून त्यांना सूक्ष्म प्रथिने पुरवठा करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून तसेच शासन निधीतून दरवर्षी राबवली जाते. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीने गेल्या दोन वर्षांसह चालू वर्षीही सातत्याने तरतूद केली, खर्चाचे नियोजनही केले; मात्र विभागाच्या संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुपोषण मुक्तीची ही योजना गेल्या तीन वर्षांपासून राबवलीच नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यातच महिला व बालकल्याण समितीने चालू वर्षातही २५ लाख रुपये तरतूद करून पौष्टिक आहार पुरवठ्याची तयारी केली आहे. त्याला समितीच्या मंजुरीनंतर तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांत योजना तर राबवलीच नाही. चालू वर्षातही त्या योजनेची प्रक्रिया सुरू न करण्याचा प्रकारही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ही बाब पाहता महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या संबंधितांकडून योजना राबवण्यात होत असलेल्या हलगर्जीपणाचे लक्ष वेधले आहे. अंगणवाड्यांमध्ये बालकांची संख्या अधिकग्रामीण भागातील १५०० पेक्षाही अधिक अंगणवाड्यांमध्ये एक लाखापेक्षाही अधिक बालकांची नोंद आहे. त्यामध्ये कमी वजनाच्या बालकांची संख्या मोठी आहे. त्या बालकांना पौष्टिक आहार देऊन त्यांचे वजन वाढवण्याचा महत्त्वांकांक्षी उपक्रम सेसफंडातून राबवला जातो. त्यासाठी दरवर्षी २५ लाख रुपये खर्चाची तरतूद असताना दोन वर्षांतील ५० लाख रुपये खर्च न करण्याचा प्रताप महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. कुपोषणासाठी संबंधितांना जबाबदार धरा!पावसाळ्याच्या दिवसांत बालकांचे आरोग्य बिघडते. या काळात प्रतिकारशक्ती कमी होण्यास कुपोषणही कारणीभूत ठरू शकते. गेल्या तीन वर्षांत बालकांना कुपोषण रोखणारा आहारच न दिल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सोबतच स्तनदा माता, गरोदर स्त्रिया, बालकांचे आरोग्य बिघडल्यास त्या संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्याची गरज आहे.