शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

कुपोषितांचा आहार रोखला!

By admin | Updated: July 6, 2017 01:04 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा प्रताप

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागाची कमालीची दिरंगाई जिल्ह्यातील कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर महिलांच्या जीवावर उठली आहे. गेल्या तीन वर्षांत कुपोषणाने बाल-माता मृत्यू होऊ नये, यासाठी असलेली पोषण आहार योजना विभागाने राबवलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, याबाबत सभापती देवकाबाई दिनकर पातोंड यांनी महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांना जाब विचारला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक बालके कुपोषित असल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांच्या कुपोषणावर उपाय म्हणून त्यांना सूक्ष्म प्रथिने पुरवठा करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून तसेच शासन निधीतून दरवर्षी राबवली जाते. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीने गेल्या दोन वर्षांसह चालू वर्षीही सातत्याने तरतूद केली, खर्चाचे नियोजनही केले; मात्र विभागाच्या संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कुपोषण मुक्तीची ही योजना गेल्या तीन वर्षांपासून राबवलीच नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यातच महिला व बालकल्याण समितीने चालू वर्षातही २५ लाख रुपये तरतूद करून पौष्टिक आहार पुरवठ्याची तयारी केली आहे. त्याला समितीच्या मंजुरीनंतर तांत्रिक मंजुरीही मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांत योजना तर राबवलीच नाही. चालू वर्षातही त्या योजनेची प्रक्रिया सुरू न करण्याचा प्रकारही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ही बाब पाहता महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या संबंधितांकडून योजना राबवण्यात होत असलेल्या हलगर्जीपणाचे लक्ष वेधले आहे. अंगणवाड्यांमध्ये बालकांची संख्या अधिकग्रामीण भागातील १५०० पेक्षाही अधिक अंगणवाड्यांमध्ये एक लाखापेक्षाही अधिक बालकांची नोंद आहे. त्यामध्ये कमी वजनाच्या बालकांची संख्या मोठी आहे. त्या बालकांना पौष्टिक आहार देऊन त्यांचे वजन वाढवण्याचा महत्त्वांकांक्षी उपक्रम सेसफंडातून राबवला जातो. त्यासाठी दरवर्षी २५ लाख रुपये खर्चाची तरतूद असताना दोन वर्षांतील ५० लाख रुपये खर्च न करण्याचा प्रताप महिला व बालकल्याण विभागाने केला आहे. कुपोषणासाठी संबंधितांना जबाबदार धरा!पावसाळ्याच्या दिवसांत बालकांचे आरोग्य बिघडते. या काळात प्रतिकारशक्ती कमी होण्यास कुपोषणही कारणीभूत ठरू शकते. गेल्या तीन वर्षांत बालकांना कुपोषण रोखणारा आहारच न दिल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सोबतच स्तनदा माता, गरोदर स्त्रिया, बालकांचे आरोग्य बिघडल्यास त्या संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्याची गरज आहे.