शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला एफडीएचे चांगले आहे. जिल्हाभर गत दाेन वर्षात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करीत तब्बल ४२२ अन्न नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यावरून आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अकाेला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गत दाेन वर्षात ७०० दुकानांपैकी तब्बल ४२२ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.

भेसळ किती?

वर्ष/महिना घेतलेले नमुनेभेसळ

२०२० २०३

जानेवारी २७

फेब्रुवारी २६

मार्च २९

एप्रिल २९

मे २८

जून ३१

जुलै २६

ऑगस्ट २३

खरेदी करताना घ्या काळजी

श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणासुदींना सुरुवात होते. यादरम्यान तेल, दूध दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यांसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढ होते. ही संधी हेरून काहीजण खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाकाळात एक लाखांचा दंड

जिल्ह्यात कार्यरत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात २०२० मध्ये २०४ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत २१९ असे एकूण ४२२ खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधिताना लाखो रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीत वाढते तपासणीचा वेग

सणासुदीच्या काळात हाॅटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील आयत्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. अकाेला जिल्ह्यात अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत असून, खाद्यपदार्थ नमुने तपासणी नियमित सुरू असते. दंडात्मक कारवाई व परवाना रद्दची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.

- रावसाहेब वाकडे

अन्नसुरक्षा अधिकारी, अकाेला