शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : आराेग्याशी थेट निगडित असलेल्या अन्नपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवायांचे प्रमाण अकाेला एफडीएचे चांगले आहे. जिल्हाभर गत दाेन वर्षात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करीत तब्बल ४२२ अन्न नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यावरून आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अकाेला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गत दाेन वर्षात ७०० दुकानांपैकी तब्बल ४२२ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.

भेसळ किती?

वर्ष/महिना घेतलेले नमुनेभेसळ

२०२० २०३

जानेवारी २७

फेब्रुवारी २६

मार्च २९

एप्रिल २९

मे २८

जून ३१

जुलै २६

ऑगस्ट २३

खरेदी करताना घ्या काळजी

श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणासुदींना सुरुवात होते. यादरम्यान तेल, दूध दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यांसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढ होते. ही संधी हेरून काहीजण खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाकाळात एक लाखांचा दंड

जिल्ह्यात कार्यरत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात २०२० मध्ये २०४ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत २१९ असे एकूण ४२२ खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधिताना लाखो रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीत वाढते तपासणीचा वेग

सणासुदीच्या काळात हाॅटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील आयत्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. अकाेला जिल्ह्यात अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत असून, खाद्यपदार्थ नमुने तपासणी नियमित सुरू असते. दंडात्मक कारवाई व परवाना रद्दची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.

- रावसाहेब वाकडे

अन्नसुरक्षा अधिकारी, अकाेला