शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बिल्डरांची नगर विकास राज्यमंत्र्यांकडे धाव

By admin | Updated: September 8, 2014 00:09 IST

अकोला मनपा आयुक्त कल्याणकर यांनी तब्बल १८७ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद केले.

अकोला : बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम केल्याची सबब पुढे करीत मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तब्बल १८७ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद केले. प्रशासनाने व्यावसायिकांनी सुधारित नकाशा सादर केल्यावर पुढील निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी तोडगा काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेतली; मात्र नियोजित बैठक झालीच नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर रहिवासी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मनपाच्या र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळामुळे जमिनींच्या भावात प्रचंड वाढ झाली. शहरात बांधकामासाठी एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर असल्यामुळे पुरेसे बांधकाम करताना बांधकाम व्यावसायीकांना अडचणी निर्माण होत असल्याची स्थिती आहे. यामुळे अनेकांनी शहरालग तच्या ग्रामपंचायत हद्दीत बांधकामे सुरु केली. यादरम्यान, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केवळ निर्माणाधिन बांधकामावर लक्ष केंद्रित करीत १८७ इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महिनाभरापूर्वी काही बांधकाम व्यावसायिकांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना गळ घातली. ही माहिती मिळताच, प्रशासनाने १८७ बांधकाम प्रकरणांपैकी १६६ प्रकरणांचा अहवाल ता तडीने शासनाकडे सादर केला. यामध्ये इमारतींचे बांधकाम मंजूर चटई निर्देशांकपेक्षा किती तरी पट जास्त असल्याचे नमूद करीत संबंधित इमारतींना कोणत्या आधारे नियमित करायचे, असा प्रतिसवाल उपस्थित केला. एकूणच, तांत्रिक अडचण लक्षात घेता, या मुद्यावर शासनाने निर्णय घेणे अद्याप बाकी असतानाच, १ सप्टेंबर रोजी स्थानिक बिल्डरांनी नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवाचे निमित्त्य पुढे करून ही बैठक जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची माहिती आहे. *प्रशासनाच्या रोखठोक भूमिकेमुळे कोंडीकाही राजकारण्यांनी रेल्वे स्टेशन चौकातील इंग्रजकालीन घोडे बांधण्याची जागा व गोरक्षण परिसरातील एका ह्यपोल्ट्री फार्मह्णची ताब्यात घेतलेली जागा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अनेकांनी इमारत बांधकामाच्या मुद्यावर प्रशासनासोबत थेट चर्चा करण्याचे टाळले. हा तिढा शासन स्तरावर सोडविण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नरत आहेत.