शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उपायुक्तांनी हटविला मंडप उपोषणकर्त्या कंत्राटदारांचा

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

महापौरांच्या दालनात ठिय्या

अकोला: थकीत देयकांच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण पुकारलेल्या जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांचा मंडप उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरला मध्यरात्री हटवला. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी संतप्त कंत्राटदारांनी चक्क महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात गाद्या टाकून ठिय्या आंदोलन छेडले. या प्रकरणी कंत्राटदारांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.मनपा जलप्रदाय विभागामार्फत सबर्मसिबल, हातपंप, जलवाहिनी दुरुस्तीची कामे करणार्‍या कंत्राटदारांचे २ कोटी ३0 लाखांचे देयक थकीत आहे. जुलै २0१४ मध्ये संबंधित कामाचा कंत्राट संपल्यानंतर पुढील कामासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली; परंतु मागील सहा महिन्यांचे थकीत देयक अदा केल्यानंतर पुढील कामाच्या निविदा स्वीकारण्याची भूमिका कंत्राटदारांनी घेतली. या मुद्यावर प्रशासनाकडून कंत्राटदारांचे थकीत देयक अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाची भूमिका लक्षात घेत, कंत्राटदारांनी १८ ऑक्टोबर २0१४ पासून मनपालगत बेमुदत उपोषण छेडले. प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून १४ नोव्हेंबर रोजी १३ कंत्राटदारांनी मनपा आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावल्याने कंत्राटदारांनी पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कंत्राटदारांवर लाठीहल्ला चढविला. अचानक उपायुक्त चिंचोलीकर यांनी २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री उपोषणकर्त्यांंचा मंडप जेसीबीच्या मदतीने हटविण्याची कारवाई केली. मंडप काढल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. दुपारनंतर मनपाच्या प्रवेशद्वारालगत कंत्राटदारांनी उपोषण सुरू ठेवले.