शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

पातुरात उड्डाणपूलाची मागणी

By admin | Updated: May 15, 2014 19:29 IST

पातूर शहरात उड्डाण पूल किंवा बायपास रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पातूर : शहरात दिवसंेदिवस वाढत असलेली वाहतूक पाहता त्यामुळे निर्माण होणार्‍या विविध समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उड्डाण पूल किंवा बायपास रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पातूर शहरातून पातूर-बाळापूर आणि वाशिम-अक ोला हे दोन मार्ग जातात. पातूर-बाळापूर मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. वाशिम-अकोला मार्गावर तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, साईबाबा विद्यालय, शाहबाबू हायस्कूल, जुने बसस्थानक, तुळसाबाई कावल विद्यालय, नवीन बसस्थानक, डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय अशा काही शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांसह नागरिकांची वस्ती आहे. वाशिम-पातूर-बाळापूर हा मार्ग मुंबई-हैदराबाद, दिल्ली, इंदूर-हैदराबाद या मार्गांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून दुचाकींसह मोठमोठी वाहने, कंटेनर, सहा ते २०-२२ चाकी ट्रक धावतात. या मार्गावर मुख्य बाजारपेठ, नागरीवस्ती, तीन शाळा, नगर परिषद कार्यालय असल्याने पायी चालणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मार्गावरील वाहनांच्या गर्दीमुळे पायी चालणार्‍यांना जीव मुुठीत घेऊनच चालावे लागते. या मार्गावर अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. त्याचप्रमाणे वाशिम-अक ोला मार्गावरही वाहनांची मोठी वर्दळ झाली आहे. जुन्या बसस्थानक चौकातून बाळापूर, तसेच अक ोल्याकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांवर तर वाहनांच्या गर्दीमुळे पायी चालणार्‍यांची चांगलीच तारांबळ उडते. जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक कमी करून इतरत्र वळविण्यासाठी येथे नवीन बायपास किंवा उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.