शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पळसाच्या पत्रावळय़ाची मागणी घटली

By admin | Updated: May 21, 2014 00:27 IST

थर्माकॉल व प्लास्टिकचा वापर वाढला

मूर्तीजापूर : पूर्वी लग्नसमारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमानिमित्त दिल्या जाणार्‍या जेवणावळींमध्ये पळसाच्या पानांपासून बनविलेल्या पत्रावळय़ा व द्रोण यांचा वापर होत असे. अलीकडे मात्र प्लॉस्टिक व थर्माकॉलच्या पत्रावळय़ा आल्यामुळे पळसाच्या पत्रावळय़ा आता नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही बुडाली आहे. एकेकाळी पळसाच्या पत्रावळीची मागणी होत होती परंतु पत्रावळीची जागा प्लस्टिकने घेतली. लग्न समारंभात पूर्वी पाना-फुलांची सजावट असायची. मोहाची पाने किंवा पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण असायचे. आता मात्र पत्रावळी व द्रोणसुद्धा प्लॉस्टिकचेच वापरण्यात येत आहेत. कोणत्याही सजावटीसाठी थर्माकोलचा सर्रास वापर होतो. हे घटक पर्यावरणात पूर्णत: मिसळत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील ह्यवापरा आणि फेकाह्ण या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. पिण्यासाठी वापरलेले पाणी पाऊच, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, आईस्क्रिम कप, चायनिज फूड्ससाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टिकचे चमचे या सर्वच माध्यमातून प्लॉस्टिकच्या वस्तूंचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असलेला दिसून येतो. याशिवाय स्वागत समारंभात वापरण्यात येणारे बुके प्लॉस्टिकच्या आवरणातच गुंडाळलेले असतात. प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. आपल्या भागातही पूर्वी पत्रावळीतच जेवण व्हायचे. मात्र कालांतराने या पानांच्या पत्रावळींची जागा चकचकीत दिसणार्‍या प्लॉस्टिकच्या पत्रावळींनी घेतली आहे. प्लॉस्टिकचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ ह्यरेडीमेडह्णच्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे. कोणताही लग्न समारंभ आटोपल्यानंतर तेथे प्लॉस्टिकचा मोठा ढिगाराच तयार होतो. त्यामुळे लग्न समारंभातील प्लॉस्टिकचा वाढता वापर पर्यावरणास हानीकारक ठरत आहे.