शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

तेल्हारा : तालुक्यात दि. २१, २२ व २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

तेल्हारा : तालुक्यात दि. २१, २२ व २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सर्वच महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यात जुलै महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नदीकाठच्या शेतात पाणी शिरून शेतजमीन खरडून गेली आहे. तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तालुक्यातील एकूण सहा मंडलांपैकी एक मंडल माळेगाव बाजार पात्र ठरले व इतर पाच मंडलांना यामधून वगळण्यात आले आहे. वास्ताविक पाहता या सर्व मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निवेदनावर अरविंद गजानन अवताडे, गणेश दादाराव पाथ्रीकर, श्रीधर व्यंकटराव देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.