शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST

सावरा : आसेगाव बाजार मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० या खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. गतमहिन्यामध्ये विमा कंपनीकडून पीकविम्याची ...

सावरा : आसेगाव बाजार मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० या खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. गतमहिन्यामध्ये विमा कंपनीकडून पीकविम्याची रक्कम जाहीर करण्यात आली; मात्र सोयाबीन पिकाचा विमा आसेगाव मंडळातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. या मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार या मंडळात अतिपावसामुळे व अज्ञात व्हायरसमुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन एकरी एक ते दोन क्विंटलचा उतारा लागला. तसेच गतवर्षी उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळेल, अशी आशा होती; मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. या सर्व प्रकारची चौकशी करून शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना १६ जून रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर डॉ. गजानन महल्ले, संदीप उगले, राजेश पाचडे व नितीन टोलमारे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.