शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बियाणे न उगवल्याने नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST

मूर्तिजापूर : तालुक्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करूनही बियाणे उगवलेच नसल्याने अस्मानी संकटासह महाबीजच्या बोगस बियाण्यांच्या संकटाला सामोरे ...

मूर्तिजापूर : तालुक्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करूनही बियाणे उगवलेच नसल्याने अस्मानी संकटासह महाबीजच्या बोगस बियाण्यांच्या संकटाला सामोरे जावे लागले. यासंदर्भात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना ७ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर २३ जून रोजी तालुका समितीने तपासणी केली. दरम्यान, महाबीजचे सोयाबीन बियाणे सदोष असल्याने उगवले नाही, असा पंचनामा करून तसा अहवाल शेतकऱ्यांना दिला आहे. तरीही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

त्या वेळीच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कारवाई तत्काळ करावी, अशा सूचना दिल्या होत्या. यावर अवर सचिव महाराष्ट्र शासन उमेश चांदिवडे यांनी २३ जून रोजी एका पत्राद्वारे यासंदर्भात महाबीजला कळविले आहे. तत्काळ बियाणे बदलून देण्यात यावे, असेही पत्रात म्हटले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांना बियाणे बदलून मिळाले नाही तर काहींना पेरणीचा कालावधी निघून गेल्यावर बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन पेरली गेली नसल्याने त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण आला आहे.

समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, सचिव सुरेश तिजारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत फरकाडे, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे व महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी प्रमोद गावंडे यांनी तपासणी करून बियाणे सदोष असल्याने उगवले नसल्याचा अहवाल दिला होता. या बदल्यात आम्हाला आर्थिक मदत मिळावी, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. आठ दिवसांत भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरविंद तायडे, युवाध्यक्ष पंकज वानखडे, तालुका उपाध्यक्ष अ. परवेज अ. मलीक, अब्दुल मलीक म. याकूब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-----------------

तक्रारींची तालुका समितीने घेतली दखल

बियाणे बोगस निघाल्याने कौलखेड जहाँगीर, अनभोरा, धानोरा वैद्य, कुरुम, हेंडज, किनखेड, पिंळशेडा, राजुरा घाटे व जामठी यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी व तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सचिव सुरेश तिजारे पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची तत्काळ दखल घेऊन तालुका समितीने प्रत्यक्ष पाहणी केली होती.