शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

वान धरणातील पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी व वान पाणी बचाओ संघर्ष समितीने मुंबई येथे १६ डिसेंबर रोजी जलसंपदा विभाग ...

तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी व वान पाणी बचाओ संघर्ष समितीने मुंबई येथे १६ डिसेंबर रोजी जलसंपदा विभाग मंत्रालयात निवेदन देऊन मागणी केली होती. अकोला शहराकरिता २९ ऑगस्ट २०१९ रोजीचा अमृत योजनेचा व ९ डिसेंबर २०२० रोजीचा बाळापूर व अकोला तालुक्यातील गावांकरिता पाणी पुरवठा योजनेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिले होते. त्याबाबत शेतकऱ्यांसोबत मंत्रालयात बैठकसुद्धा झाली होती. वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारासुद्धा दिला होता. परंतु सदर बैठकीमध्ये जलसंपदा विभागाद्वारे अकोला जिल्ह्यातील सर्व धरणांचे संबधी चौकशी करण्याचा आदेशसुद्धा देण्यात आले होते. तालुक्यातील वान धरणातील पाणी अमृत योजनेंतर्गत अकोला शहर व बाळापूर तालुक्याला देण्याबाबतचे दोन्ही शासन निर्णय कायमस्वरूपी रद्द करणे व भविष्यात पिण्याकरिता कोणताही प्रस्ताव मंजूर न करता वान धरणातील पाणी तेल्हारा तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्याची मागणी समितीने ना. जयंत पाटील यांच्याकडे केली. यावेळी वान पाणी बचाओ संघर्ष समितीचे अनिल गावंडे, शंकरराव पुंडकर गुरुजी, ॲड. सुधाकरराव खुमकर, ॲड. संदीप देशमुख, श्रीकृष्ण ठाकरे, हरिदास वाघ, मनोहर चितलांगे, गोपाल मंत्री, रामभाऊ फाटकर, मंगेश घोंगे, योगेश बीचे, दीपक अहेरकर, सतीश उंबरकर, पप्पूसेठ सोनटक्के, गोपाल जळमकर, ज्ञानेश्वर नराजे, उमेश कोरडे आदी शेतकरी उपस्थित होते.