शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

वानच्या पाणी मंजुरीला स्थगितीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST

अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) ...

अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) हे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आले आहे. धरण बांधणीचे प्रस्तावावेळी तेल्हारा तालुक्यातील १९,१७७ हेक्टर जमीन ही धरणाचे पाण्यातून सिंचनाकरिता प्रस्तावित होती. त्याकरिता १०६.३४५७ द.ल.घ.मी. पाणी आवश्यक होते. परंतु धारण बांधल्यानंतर धरणातील पाण्याची क्षमता ८४.४३४ द.ल.घ.मी. आहे. त्यामधील दरवर्षी ३ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन तसेच ३ द.ल.घ.मी. पाण्याची धरणातून गळती होते. त्यामुळे धरणामध्ये जिवंत साठा फक्त ७८.४३४ द.ल.घ.मी. इतका आहे. त्यामुळे मुळातच सिंचनाकरिता २७.७७२४ द.ल.घ.मी. इतक्या पाण्याची तूट आहे. वान धरणाचे निर्मितीवेळी धरणातील फक्त २२ टक्के पाणीच पिण्यासाठी प्रस्तावित होते. परंतु पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता शासनाने या धरणातून अकोट शहराकरिता ८.६६ द.ल.घ.मी., तेल्हारा शहराकरिता ३.१६ द.ल.घ.मी., जळगाव जा. शहराकरिता ४.०२ द.ल.घ.मी. ८४ खेडी योजनेकरिता ४.२३९ द.ल.घ.मी., शेगाव शहराकरिता ५.६२ द.ल.घ.मी. तसेच जळगाव तालुक्यातील खेड्यांकरिता ८.४५४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झाले आहे आणि अकोला शहर अमृत योजनेकरिता २४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झालेले आहे. परंतु या योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तो शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची होती तसेच तेल्हारा-अकोट मतदारसंघातील १५९ खेडी योजना सुद्धा प्रस्तावित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते, त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचत असून, सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने ३ जानेवारीला वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याचे जाहीर केले असून, त्यापूर्वी मुंबईला जाऊन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील जलसंपदामंत्री जयंतराव पाटील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन वानच्या पाण्यासंदर्भात सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे. याबाबत बाजू मांडून मागण्या सादर करणार आहेत.