शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

वानच्या पाणी मंजुरीला स्थगितीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST

अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) ...

अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) हे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आले आहे. धरण बांधणीचे प्रस्तावावेळी तेल्हारा तालुक्यातील १९,१७७ हेक्टर जमीन ही धरणाचे पाण्यातून सिंचनाकरिता प्रस्तावित होती. त्याकरिता १०६.३४५७ द.ल.घ.मी. पाणी आवश्यक होते. परंतु धारण बांधल्यानंतर धरणातील पाण्याची क्षमता ८४.४३४ द.ल.घ.मी. आहे. त्यामधील दरवर्षी ३ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन तसेच ३ द.ल.घ.मी. पाण्याची धरणातून गळती होते. त्यामुळे धरणामध्ये जिवंत साठा फक्त ७८.४३४ द.ल.घ.मी. इतका आहे. त्यामुळे मुळातच सिंचनाकरिता २७.७७२४ द.ल.घ.मी. इतक्या पाण्याची तूट आहे. वान धरणाचे निर्मितीवेळी धरणातील फक्त २२ टक्के पाणीच पिण्यासाठी प्रस्तावित होते. परंतु पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता शासनाने या धरणातून अकोट शहराकरिता ८.६६ द.ल.घ.मी., तेल्हारा शहराकरिता ३.१६ द.ल.घ.मी., जळगाव जा. शहराकरिता ४.०२ द.ल.घ.मी. ८४ खेडी योजनेकरिता ४.२३९ द.ल.घ.मी., शेगाव शहराकरिता ५.६२ द.ल.घ.मी. तसेच जळगाव तालुक्यातील खेड्यांकरिता ८.४५४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झाले आहे आणि अकोला शहर अमृत योजनेकरिता २४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित झालेले आहे. परंतु या योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तो शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची होती तसेच तेल्हारा-अकोट मतदारसंघातील १५९ खेडी योजना सुद्धा प्रस्तावित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते, त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचत असून, सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने ३ जानेवारीला वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याचे जाहीर केले असून, त्यापूर्वी मुंबईला जाऊन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील जलसंपदामंत्री जयंतराव पाटील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन वानच्या पाण्यासंदर्भात सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे. याबाबत बाजू मांडून मागण्या सादर करणार आहेत.