शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

उष्णतापमानामुळे कांद्याच्या उत्पादनात घट

By admin | Updated: April 30, 2017 19:46 IST

महान- उष्णतापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाचा चटका कांद्याने सहन न केल्यामुळे कांद्यची उभी पाल झपाट्याने खाली कोसळली.

शेतकरी आर्थिक संकटातमहान : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महान व परिसरातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात कांद्याची लागवड केली होती.तुरीचे पीक एक महिना पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव फेब्रुवारी महिन्यात कांद्याची लागवड करावी लागली. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकास रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी, निंदन इत्यादवर खर्च केला. दोन महिन्याच्या कालावधीनंतर कांदा परिपक्व होतो. कांदा परिपक्व झाला की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. परंतु यावर्षी उष्णतापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाचा चटका कांद्याने सहन न केल्यामुळे कांद्यची उभी पाल झपाट्याने खाली कोसळली. नाइलाजास्तव शेतकऱ्यांनी कांद्याला उपटण्यास सुरुवात केली असता कांदा एकसारखे परिपक्व झाले नसून त्यामध्ये तीन प्रकारचे आकार झाले आहेत. त्या कारणामुळे या वषी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट निर्माण होणार. अगोदरच शेतकरीवर्ग वैतागला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.कांदापिकास लावगडीपासून ते कापण्यापर्यंत एकरी ३५ हजार रुपयाच्या वर खर्च शेतकऱ्यांना येतो. अन् भाव पाहिले तर पाच ते सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारात आहेत. दरवर्षी पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उष्णतापमानाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. उष्णतापमानामुळे यावर्षी शेतकऱ्यांन कांद्याच्या पिकात ५० टक्क्याहुन अधिक घट होणार आहे. खरिपासह रब्बीतही शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकारणामुळे महान व परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहे.

मागच्या वर्षी कांद्याला भाव अत्यंत कमी प्रमाणात असल्याने लावलेला खर्चही काढता आला नव्हता. त्या कारणाने मी यावर्षी केवळ एकच एकरात कांद्याची लागवड केली असून मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ३५ ते ३६ हजार रुपये खर्च आला आहे. उष्णतापमानामुळे कांद्याची पाल लवकर पडल्याने कांदा परिपक्व झाला नाही. त्यामुळे उत्पन्नात घट येत आहे.- अ. रशीद शे. कालू, कांदा उत्पादक, महान.