शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

उष्णतापमानामुळे कांद्याच्या उत्पादनात घट

By admin | Updated: April 30, 2017 19:46 IST

महान- उष्णतापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाचा चटका कांद्याने सहन न केल्यामुळे कांद्यची उभी पाल झपाट्याने खाली कोसळली.

शेतकरी आर्थिक संकटातमहान : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महान व परिसरातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात कांद्याची लागवड केली होती.तुरीचे पीक एक महिना पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव फेब्रुवारी महिन्यात कांद्याची लागवड करावी लागली. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकास रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी, निंदन इत्यादवर खर्च केला. दोन महिन्याच्या कालावधीनंतर कांदा परिपक्व होतो. कांदा परिपक्व झाला की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. परंतु यावर्षी उष्णतापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाचा चटका कांद्याने सहन न केल्यामुळे कांद्यची उभी पाल झपाट्याने खाली कोसळली. नाइलाजास्तव शेतकऱ्यांनी कांद्याला उपटण्यास सुरुवात केली असता कांदा एकसारखे परिपक्व झाले नसून त्यामध्ये तीन प्रकारचे आकार झाले आहेत. त्या कारणामुळे या वषी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट निर्माण होणार. अगोदरच शेतकरीवर्ग वैतागला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.कांदापिकास लावगडीपासून ते कापण्यापर्यंत एकरी ३५ हजार रुपयाच्या वर खर्च शेतकऱ्यांना येतो. अन् भाव पाहिले तर पाच ते सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारात आहेत. दरवर्षी पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उष्णतापमानाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. उष्णतापमानामुळे यावर्षी शेतकऱ्यांन कांद्याच्या पिकात ५० टक्क्याहुन अधिक घट होणार आहे. खरिपासह रब्बीतही शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकारणामुळे महान व परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहे.

मागच्या वर्षी कांद्याला भाव अत्यंत कमी प्रमाणात असल्याने लावलेला खर्चही काढता आला नव्हता. त्या कारणाने मी यावर्षी केवळ एकच एकरात कांद्याची लागवड केली असून मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ३५ ते ३६ हजार रुपये खर्च आला आहे. उष्णतापमानामुळे कांद्याची पाल लवकर पडल्याने कांदा परिपक्व झाला नाही. त्यामुळे उत्पन्नात घट येत आहे.- अ. रशीद शे. कालू, कांदा उत्पादक, महान.