शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तुरीच्या उत्पादनात घट; शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तत्काळ दखल घेऊन पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात तुरीचे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील चोंढी, चारमोळी, पिंपळडोळी शिवारात तूर सोंगणीला सुरुवात झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा तुरीचे एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तूर पिकापासून भरपूर उत्‍पादन मिळते. त्‍यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्‍हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होत असल्याने तुरीचे पीकही आता न परवडणारे झाले आहे. यंदा परतीचा पाऊस व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीला आलेली फुले झडून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनात घट झाल्याने खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)

---------------------------------

मूग, उडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने तुरीवर आशा होती. मात्र, तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. खर्च परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोंगणीच केली नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा.

- पंडीत देवकते, शेतकरी, पांढुर्णा