शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

तुरीच्या उत्पादनात घट; शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...

पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तत्काळ दखल घेऊन पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात तुरीचे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील चोंढी, चारमोळी, पिंपळडोळी शिवारात तूर सोंगणीला सुरुवात झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा तुरीचे एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तूर पिकापासून भरपूर उत्‍पादन मिळते. त्‍यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्‍हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होत असल्याने तुरीचे पीकही आता न परवडणारे झाले आहे. यंदा परतीचा पाऊस व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीला आलेली फुले झडून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनात घट झाल्याने खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)

---------------------------------

मूग, उडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने तुरीवर आशा होती. मात्र, तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. खर्च परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोंगणीच केली नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा.

- पंडीत देवकते, शेतकरी, पांढुर्णा