शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्हा परिषदेच्या सभेत ‘त्या’ ठरावांवर घेता येणार नाही निर्णय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

अकोला: आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास ...

अकोला: आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी २ सप्टेंबरला दिला. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर संबंधित ठराव ठेवण्यात आले; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता पुन्हा लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ ठरावांवर या सभेत निर्णय घेता येणार नसल्याने, मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गत २३ जून रोजी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असताना, सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांना मंजुरी देण्यात आल्याने, आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत, मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांच्यावतीने अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले होते. आचारसंहिता लागू असताना सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करीत, संबंधित ठराव जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन निर्णय घेण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर संंबंधित १२ ठराव मंजुरीसाठी घेण्यात आले; मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता पुन्हा लागू करण्यात आल्याने, विषयपत्रिकेवर घेण्यात आलेल्या ‘त्या’ १२ ठरावांवर सर्वसाधारण सभेत निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे या ठरावांना सर्वसाधारण सभेची मंजुरी देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करुन संबंधित ठराव येत्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार संबंधित ठराव २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले. परंतू जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने, संबंधित ठरावांवर पुढील सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर सुलताने

गटनेता, सत्तापक्ष, जिल्हा परिषद.