शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कर्जमाफी, पीक कर्जाचा लाभ न देणार्‍या बँकांवर होणार कारवाई - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:08 IST

अकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्‍यांना लाभ न देणार्‍या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे दिला. 

ठळक मुद्देएकही शेतकरी वंचित राहता कामा नये!किशोर तिवारी यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्‍यांना लाभ न देणार्‍या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा उप निबंधक गोपाळ मावळे,  उप विभागीय अधिकारी संजय खडसे, उप जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण उपस्थित होते.कर्जमाफीसंदर्भात बँकांकडून योग्य माहिती देण्यात येत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून प्राप्त होत आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी कर्जाची रक्कम शासनामार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. त्यामुळे  पात्र एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत बँकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या. ‘मागेल त्याला पीक कर्ज’ योजनेत शासनामार्फत प्रत्येक शेतकर्‍याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगत, येत्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्वी शेतकर्‍यांना पीक कर्ज प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी जिल्हा सहकारी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे, तसेच या कामाकडे जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. पीक कर्जाच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन, या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ हजार ४00 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे  निर्देशही तिवारी यांनी यावेळी दिले. या बैठकीला विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

शेतकर्‍यांना आरोग्य सेवांचा लाभ द्या!शेतकर्‍यांचा आरोग्यावरील खर्च करण्यासाठी महात्मा फुले जनकल्याण योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी शेतकर्‍यांना लाभ देऊन, शेतकर्‍यांना सुदृढ आरोग्य सेवांचा लाभ देण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी दिले. जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेत, औषधांचा पुरवठा, आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तक्रारींची माहिती त्यांनी घेतली.

कृषी पंप, पाणी पुरवठय़ाची वीज जोडणी कापू नका!शेतकर्‍यांना कृषी पंपांसाठी वीज तातडीने देण्याचे सांगत, पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतींची वीज जोडणी कापू नये, त्यासाठी जिल्हा परिषद व वीज वितरण कंपनीने प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी दिले.

खासगी शाळा शुल्क नियंत्रणासाठी समिती करा!प्राथमिक शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने, शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी शाळांचे शुल्क नियंत्रणात ठेवण्यासाठी शुल्क निर्धारण समिती गठित करण्याचे निर्देश तिवारी  यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. तसेच ग्रामीण भागातील शाळा व आश्रमशाळांमध्ये मुख्यालयी न राहणार्‍या शिक्षकांवर करण्यात आलेली कारवाई आणि पटसंख्या कमी होत असलेल्या शाळा व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीदेखील त्यांनी घेतली. 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी