शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतक-यांच्या नावावरील निधीतून कर्जवसुली!

By admin | Updated: August 12, 2015 23:21 IST

जिल्हा बँकेत शेतक-यांची दिशाभूल, कर्ज पुनर्गठनाचा प्रत्यक्ष लाभ नावालाच.

अकोला- दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासनाने हमी घेत नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुनर्गठनासाठी निधी दिला. शेतकर्‍यांच्या नावावर मिळालेल्या या निधीतून संकटातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत व्हावी, हा शासनाचा प्रामाणिक हेतू असला तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून या निधीचा उपयोग थकीत कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या वसुलीसाठी होत आहे. राज्य शासनाने पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे नवीन कर्ज देण्यासाठी निधीचा पेच निर्माण झाला होता. नाबार्डकडून निधी मिळत नाही, तोपर्यंंत कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया राबविता येणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकांनी घेतली होती. त्यामुळे राज्य शासनाने नाबार्डकडून मिळणार्‍या कर्जाची हमी घेत जिल्हा बँकांना निधी दिला. त्यातून जिल्हा बँकांनी सरसकट कर्ज पुनर्गठन करून शेतकर्‍यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता जिल्हा बँकांनी त्यांच्या खातेदारांकडे थकीत असलेल्या कर्जाची व त्यावरील व्याजाच्या वसुलीसाठी या निधीचा उपयोग सुरू केला आहे. जिल्हा बँकांनी २0१३ आणि २0१४ च्या हंगामात वितरित केलेल्या कर्जाचे पुनर्गठन करताना शेतकर्‍यांकडून २0१३ च्या हंगामातील कर्जाचा हप्ता वसूल करणे सुरू केले आहे. प्रतिएकर सुमारे ३.५ हजार रुपयांपर्यंंत हप्ता आणि त्यावरील २.५ हजार रुपयांपर्यंंतचे व्याज वसुली शेतकर्‍यांकडून केली जात आहे. त्या बदल्यात कर्ज पुनर्गठनानंतर एकरी ७ हजार रुपयांपर्यंंतच कर्ज दिले जात आहे. हे कर्ज नाबार्डकडून मिळालेल्या निधीतूनच दिले जात आहे. प्रत्यक्षात जिल्हा बँकांनी त्यांचा १0 टक्के हिस्साही त्यात टाकणे अपेक्षित होते. तसे होत नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत ५0 टक्केच कर्ज शेतकर्‍यांना मंजूर होत असून, त्यातही कर्जाचा हप्ता आणि व्याज वसुलीमध्ये ५ ते ६ हजार रुपयांची कपात होत असल्याने शेतकर्‍यांच्या हाती प्रत्यक्षात ५00 ते १000 रुपयेच पडत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने दिलेल्या निधीचा उपयोग शेतकर्‍यांना होण्याऐवजी जिल्हा बँका त्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठीच करून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

*कर्ज पुनर्गठनाचा फायदा कुणाला?

       राज्य शासनाच्यावतीने कर्ज पुनर्गठनाबाबतचे स्पष्ट निर्देश व त्यासाठी लागणार्‍या निधीची तरतूद करण्याचा आदेश काढला होता. त्यानंतर १३ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी याबाबत बँकांना स्पष्ट निर्देशही दिले. पणनमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनानंतर शेतकर्‍यांना वाढीव पीक कर्ज देणे शक्य होणार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात जिल्हा बँकांकडून कर्जाचे पुनर्गठन होत असताना शेतकर्‍यांना दिले जात असलेले कर्ज हे गतवर्षीच्या तुलनेत ५0 टक्केच आहे. त्यातूनही २0१३ च्या कर्जाचा हप्ता आणि व्याजाची वसुली होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या वसुलीचा टक्का वाढत असून, शेतकर्‍यांना मात्र त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी मात्र शेतकर्‍यांना वाढीव कर्ज दिली आणि कर्ज व व्याजाच्या वसुलीचाही प्रश्न उद्भवला नाही.

*१५ महिन्यांच्या व्याजाची वसुली

           जिल्हा बँकेतर्फे कर्ज पुनर्गठनानंतर शेतकर्‍यांकडून २0१३ च्या पीक कर्जाचे १५ महिन्यांच्या व्याजाची वसुली केली जात आहे. तेही १२ टक्के व्याज दर आकारून व्याजाची वसुली होत असल्याने कर्ज पुनर्गठनाचा कोणताही फायदा शेतकर्‍यांना मिळू शकला नाही.