शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कर्ज वसुलीचा मुद्दा दुष्काळात ऐरणीवर; अकोला जिल्ह्यातील ९९0 गावांत दुष्काळ जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:07 IST

अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.

ठळक मुद्देनिकषांची आडकाठी 

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकºयांवर भीक नको, पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,००० पैकी १,६९,९२० एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. आॅनलाइन अर्ज केल्यानंतर ती संख्या १,३८,९६३ वर स्थिरावली. त्या शेतकºयांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करणे सुरू आहे. त्याचवेळी कर्जदार शेतकºयांकडे शासनाने ठरवून दिलेले मुदतबाह्य कर्जही निश्चित केले जात आहे. प्रत्येक शेतकºयांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी ४० ते ५० टक्के रक्कम शासनाने ठरवून दिलेल्या थकीत शब्दाच्या मुदतीत न बसणारी ठरत आहे. त्यातही कर्जमाफ होणारी रक्कम १ लाख ५० हजारांपेक्षा कितीतरी कमी होत आहे. त्यामुळे नगण्य प्रमाणातील शेतकºयांनाच १ लाख ५० हजार रुपये एवढी माफी मिळण्याची शक्यता आहे. १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक कर्ज रक्कम थकीत शेतकºयांना किमान ६० ते ७० हजार रुपये बँकेत आधी भरावे लागणार आहेत. शेतकºयांकडून ती रक्कम जमा झाल्याची खात्री बँक व्यवस्थापनाकडून झाल्यानंतरच शासनाच्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम भरण्यासाठी शासन तसेच बँकांकडून ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

दुष्काळात थकीत कर्ज कसे भरणार?शासनाने राज्यातील १४ हजारांपेक्षाही अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. अकोला जिल्ह्यातील ९९० गावे दुष्काळी आहेत. दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याची सोय आहे; मात्र जिल्ह्यातील बँका ती सोय शेतकºयांना देतात की वसुली करतात, हा मुद्दा गंभीर होणार आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी भरावयाची थकीत रक्कमही मोठी असल्याने ती कशी भरावी, ही समस्याही उभी ठाकली आहे. 

शासनाच्या कर्जमाफीची रक्कम ‘आॅन होल्ड’!शासनाने शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. मात्र, ती रक्कम ‘होल्ड’ ठेवण्यात आली. जोपर्यंत शेतकरी त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम बँकेत जमा करत नाहीत. तोपर्यंत शासनाची रक्कम त्यांच्या खात्यात दिसेल मात्र, जमा होणार नाही, अशीच व्यवस्था करण्याचे बँकांना बजावण्यात आले. 

टॅग्स :Akolaअकोला