शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कर्ज वसुलीचा मुद्दा दुष्काळात ऐरणीवर; अकोला जिल्ह्यातील ९९0 गावांत दुष्काळ जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:07 IST

अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.

ठळक मुद्देनिकषांची आडकाठी 

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकºयांवर भीक नको, पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,००० पैकी १,६९,९२० एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. आॅनलाइन अर्ज केल्यानंतर ती संख्या १,३८,९६३ वर स्थिरावली. त्या शेतकºयांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करणे सुरू आहे. त्याचवेळी कर्जदार शेतकºयांकडे शासनाने ठरवून दिलेले मुदतबाह्य कर्जही निश्चित केले जात आहे. प्रत्येक शेतकºयांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी ४० ते ५० टक्के रक्कम शासनाने ठरवून दिलेल्या थकीत शब्दाच्या मुदतीत न बसणारी ठरत आहे. त्यातही कर्जमाफ होणारी रक्कम १ लाख ५० हजारांपेक्षा कितीतरी कमी होत आहे. त्यामुळे नगण्य प्रमाणातील शेतकºयांनाच १ लाख ५० हजार रुपये एवढी माफी मिळण्याची शक्यता आहे. १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक कर्ज रक्कम थकीत शेतकºयांना किमान ६० ते ७० हजार रुपये बँकेत आधी भरावे लागणार आहेत. शेतकºयांकडून ती रक्कम जमा झाल्याची खात्री बँक व्यवस्थापनाकडून झाल्यानंतरच शासनाच्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम भरण्यासाठी शासन तसेच बँकांकडून ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

दुष्काळात थकीत कर्ज कसे भरणार?शासनाने राज्यातील १४ हजारांपेक्षाही अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. अकोला जिल्ह्यातील ९९० गावे दुष्काळी आहेत. दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याची सोय आहे; मात्र जिल्ह्यातील बँका ती सोय शेतकºयांना देतात की वसुली करतात, हा मुद्दा गंभीर होणार आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी भरावयाची थकीत रक्कमही मोठी असल्याने ती कशी भरावी, ही समस्याही उभी ठाकली आहे. 

शासनाच्या कर्जमाफीची रक्कम ‘आॅन होल्ड’!शासनाने शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. मात्र, ती रक्कम ‘होल्ड’ ठेवण्यात आली. जोपर्यंत शेतकरी त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम बँकेत जमा करत नाहीत. तोपर्यंत शासनाची रक्कम त्यांच्या खात्यात दिसेल मात्र, जमा होणार नाही, अशीच व्यवस्था करण्याचे बँकांना बजावण्यात आले. 

टॅग्स :Akolaअकोला