शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रब्बी हंगामात उद्दिष्टाच्यावर कर्जवाटप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST

क्लिष्ट अटी, कागदपत्रांची अडचण या कारणांमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित रहावे लागते. मागील वर्षी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती ...

क्लिष्ट अटी, कागदपत्रांची अडचण या कारणांमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित रहावे लागते. मागील वर्षी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यामुळे रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. बँकांच्या अटींची पूर्तताही शेतकऱ्यांना करता आली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. या पिकाची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन हंगामाचे नियोजन करतात. मागील खरीप हंगामात जिल्ह्यात ७४ टक्के कर्जवाटप झाले होते. यावेळी सुमारे १ लाख ६ हजार ४३४ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले, तर रब्बी हंगामात ६ हजार ५०० शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील ६ हजार ४०३ शेतकऱ्यांना ६३ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये कर्जवाटप झाले. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ घेता आला आहे.

--बॉक्स--

बँकांकडून झालेले कर्जवाटप

सार्वजनिक क्षेत्रातील बँक

३८ कोटी ७३ लाख ९५ हजार रुपये

खासगी क्षेत्रातील बँक

१६ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपये

विदर्भ कोकण ग्रामीण बँक

७ कोटी १२ लाख ४२ हजार रुपये

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

९९ लाख ८८ हजार रुपये