शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अपूर्ण सिंचन विहिरी पूर्ण करण्यास जूनपर्यंत मुदत!

By admin | Updated: January 11, 2015 01:19 IST

कामे पूर्ण न झाल्यास जबाबदार धरणार; यापुढे मुदतवाढ मिळणार नाही.

संतोष येलकर /अकोला

रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात जवाहर विहीर व धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण असलेली विहिरींची कामे पूर्ण करण्यास ३0 जून २0१५ पर्यंत शासनामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. विहिरींची कामे पूर्ण करण्यास यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसून, कामे अपूर्ण राहिल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सन २00७-0८ आणि २00८-0९ मध्ये ५१ हजार ८00 जवाहर विहिरी आणि ८३ हजार २00 धडक सिंचन विहिरींचे उद्दिष्ट शासनामार्फत ठरवून देण्यात आले होते. या योजनांतर्गत विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी वाढ करुन अडीच लाखापर्यंत अनुदान करण्याचा निर्णय गतवर्षी शासनामार्फत घेण्यात आला.त्या निर्णयानुसार सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै २0१४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.परंतू या मुदतीत अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी आता ३0 जून २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत २२ डिसेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार, विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांमधील अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरींची कामे कोणत्याही परिस्थितीत ३0 जून २0२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन, विहीत कालावधीत सिंचन विहिरींची कामे पूर्ण होतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आले. तसेच या कालावधीत सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येणार आहे, असा इशारादेखिल शासनाच्या रोहयो विभागामार्फत निर्गमीत करण्यात आलेल्या निर्णयात देण्यात आला आहे.