शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

दिवस ४३; कामे ५२0!

By admin | Updated: May 16, 2015 00:55 IST

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची केवळ २७ कामे पूर्ण.

संतोष येलकर /अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात ४५८ गावांमध्ये ५८२ उ पाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, १४ मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यास केवळ ४३ दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत कृती आराखड्यातील राहिलेली ५२0 उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. तापत्या उन्हासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांमध्ये ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या आराखड्याला १७ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस् तावांनुसार एकूण उपाययोजनांपैकी १७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी १३ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून, ५३ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. एकूण उ पाययोजनांच्या कामांपैकी केवळ २७ उपाययोजनांचीच कामे पूर्ण झाली. पाणीटंचाई निवारणाची कामे ३0 जूनपर्यंत करता येतील, पावसाळ्यात ही कामे करता येणार नाहीत, त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांची कामे करण्यास शिल्लक राहिलेल्या ४४ दिवसांत कृती आराखड्यातील उर्वरित ५२0 उ पाययोजनांची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण झाले असल्याच्या स्थितीत दुसरीकडे मात्र शेकडो उपाययोजनांची कामे रखडली आहेत.