शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दिवस ४३; कामे ५२0!

By admin | Updated: May 16, 2015 00:55 IST

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची केवळ २७ कामे पूर्ण.

संतोष येलकर /अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात ४५८ गावांमध्ये ५८२ उ पाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, १४ मेपर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यास केवळ ४३ दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत कृती आराखड्यातील राहिलेली ५२0 उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. तापत्या उन्हासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावागावांमध्ये ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपये खर्च प्रस्तावित असलेल्या या आराखड्याला १७ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस् तावांनुसार एकूण उपाययोजनांपैकी १७७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी १३ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २७ उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून, ५३ उपाययोजनांची कामे सुरू आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर झाल्यानंतर पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला. एकूण उ पाययोजनांच्या कामांपैकी केवळ २७ उपाययोजनांचीच कामे पूर्ण झाली. पाणीटंचाई निवारणाची कामे ३0 जूनपर्यंत करता येतील, पावसाळ्यात ही कामे करता येणार नाहीत, त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी उ पाययोजनांची कामे करण्यास शिल्लक राहिलेल्या ४४ दिवसांत कृती आराखड्यातील उर्वरित ५२0 उ पाययोजनांची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण झाले असल्याच्या स्थितीत दुसरीकडे मात्र शेकडो उपाययोजनांची कामे रखडली आहेत.