शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

पेरणीच्या वेळी दांडी; काढणीच्या वेळी जोर

By admin | Updated: March 13, 2015 01:36 IST

एका वर्षात तीन वेळा शेतकर्‍यांना ‘अवकाळी’ पावसाचा फटका

विवेक चांदूरकर / अकोला: निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, २0१४-१५ या वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीच्या वेळी आवश्यकता असताना पावसाने दांडी दिली तर काठणीच्यावेळी आवश्यकता नसताना अवकाळी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे एकाच वर्षात शेतकर्‍यांना कोरडा व ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. २0१४ साली खरीप हंगामात पावसाने दांडी दिली. ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वर्‍हाडात पेरणी केली जाते. यादरम्यान पेरणी झाली तर पिकेही जोमात येतात. मात्र, गत वर्षी जुलै महिन्याच्या २३ तारखेला म्हणजे तब्बल दीड महिने पाऊस उशिरा आला. त्यामुळे संपूर्ण हंगामच बदलला. मूग व उडिदाची पिके बाद झाली. त्यामुळे केवळ कपाशी व सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस धो धो बरसला. त्यानंतर परतीचा पाऊस आलाच नाही. पेरणी तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे व परतीचा पाऊस न आल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात प्रचंड घट आली. जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. खरीप हंगामात नुकसानीचा सामना करावा लागल्यानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली. परतीचा पाऊस न आल्यामुळे रब्बी हंगामात जमीन कोरडी होती. परिणामी १५ ते २0 टक्के शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र जमिनीत ओल नसल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात घट आली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही पिके फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीला येतात. गहू व हरभर्‍याची पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. २८ फेब्रुवारीला आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यामुळे यावर्षी आवश्यकता असताना पाऊस आलाच नाही तर अवकाळी पाऊस अनेकदा बरसला.