शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

पेरणीच्या वेळी दांडी; काढणीच्या वेळी जोर

By admin | Updated: March 13, 2015 01:36 IST

एका वर्षात तीन वेळा शेतकर्‍यांना ‘अवकाळी’ पावसाचा फटका

विवेक चांदूरकर / अकोला: निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, २0१४-१५ या वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीच्या वेळी आवश्यकता असताना पावसाने दांडी दिली तर काठणीच्यावेळी आवश्यकता नसताना अवकाळी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे एकाच वर्षात शेतकर्‍यांना कोरडा व ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. २0१४ साली खरीप हंगामात पावसाने दांडी दिली. ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वर्‍हाडात पेरणी केली जाते. यादरम्यान पेरणी झाली तर पिकेही जोमात येतात. मात्र, गत वर्षी जुलै महिन्याच्या २३ तारखेला म्हणजे तब्बल दीड महिने पाऊस उशिरा आला. त्यामुळे संपूर्ण हंगामच बदलला. मूग व उडिदाची पिके बाद झाली. त्यामुळे केवळ कपाशी व सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस धो धो बरसला. त्यानंतर परतीचा पाऊस आलाच नाही. पेरणी तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे व परतीचा पाऊस न आल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात प्रचंड घट आली. जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. खरीप हंगामात नुकसानीचा सामना करावा लागल्यानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली. परतीचा पाऊस न आल्यामुळे रब्बी हंगामात जमीन कोरडी होती. परिणामी १५ ते २0 टक्के शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र जमिनीत ओल नसल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात घट आली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही पिके फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीला येतात. गहू व हरभर्‍याची पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. २८ फेब्रुवारीला आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यामुळे यावर्षी आवश्यकता असताना पाऊस आलाच नाही तर अवकाळी पाऊस अनेकदा बरसला.