शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पेरणीच्या वेळी दांडी; काढणीच्या वेळी जोर

By admin | Updated: March 13, 2015 01:36 IST

एका वर्षात तीन वेळा शेतकर्‍यांना ‘अवकाळी’ पावसाचा फटका

विवेक चांदूरकर / अकोला: निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला असून, २0१४-१५ या वर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पेरणीच्या वेळी आवश्यकता असताना पावसाने दांडी दिली तर काठणीच्यावेळी आवश्यकता नसताना अवकाळी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे एकाच वर्षात शेतकर्‍यांना कोरडा व ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण वर्षात दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. २0१४ साली खरीप हंगामात पावसाने दांडी दिली. ७ जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात वर्‍हाडात पेरणी केली जाते. यादरम्यान पेरणी झाली तर पिकेही जोमात येतात. मात्र, गत वर्षी जुलै महिन्याच्या २३ तारखेला म्हणजे तब्बल दीड महिने पाऊस उशिरा आला. त्यामुळे संपूर्ण हंगामच बदलला. मूग व उडिदाची पिके बाद झाली. त्यामुळे केवळ कपाशी व सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस धो धो बरसला. त्यानंतर परतीचा पाऊस आलाच नाही. पेरणी तब्बल दोन महिने उशिरा झाल्यामुळे व परतीचा पाऊस न आल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात प्रचंड घट आली. जवळपास ७0 टक्के शेतकर्‍यांना खरीप हंगामात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त घट आली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. खरीप हंगामात नुकसानीचा सामना करावा लागल्यानंतर शेतकर्‍यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती. मात्र, रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली. परतीचा पाऊस न आल्यामुळे रब्बी हंगामात जमीन कोरडी होती. परिणामी १५ ते २0 टक्के शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. रब्बी हंगामात हरभरा व गव्हाची मोठय़ा प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र जमिनीत ओल नसल्यामुळे या पिकांच्याही उत्पादनात घट आली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात पेरणी करण्यात आलेली ही पिके फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीला येतात. गहू व हरभर्‍याची पिके काढणीला आली असतानाच अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. २८ फेब्रुवारीला आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. त्यामुळे यावर्षी आवश्यकता असताना पाऊस आलाच नाही तर अवकाळी पाऊस अनेकदा बरसला.