शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्या वर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळांत शेतकऱ्यांच्या ७०० ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यात ६ व ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळांत शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्या वर शेतीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानुसार ४४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात कहर केला आहे. अनेक गावांतील घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काठावरील जमीन पाण्याखाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेताला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र आहे.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे उमा, पूर्णा, कमळगंगा, काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या शेतांत पुराचे पाणी घुसून शेतकऱ्यांच्या ४४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ६ ते ७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या पावसाची ८१.९ मिलीमीटर नोंद करण्यात आली, तर ८ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत १०.७ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. आतापर्यंत तालुक्यात ७२६.९ मिलीमीटर पाऊस झाला असून, त्याची सरासरी ७२६.९ टक्के आहे. शासनाने तालुक्यातील महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-----------------

शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा

गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी विमा कंपनीच्या ॲप्सद्वारे तत्काळ फोटो काढून ऑनलाइन तक्रार करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

------------------

६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, जवळपास ३४ घरांची अंशतः पडझड झाली आणि ४४३ हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घराच्या पडझडीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, शेतातील पाणी ओसरल्यावर शेतीपिकाच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यात येतील.

- प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

-------------------

तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांत नुकसानीचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच पीक विमा काढलेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा.

- अमृता काळे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर