शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या ...

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने ३० हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, तब्बल २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे.

पाऊस सतत सुरू असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत महिन्यातही परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्व्हे करण्यात आला; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिसरात पिके काढणीला आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतित आहे. उडीद, मूग पिके हातातून गेली आता सोयबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र तेही हातातून जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी अमित सबनीस, तलाठी लाड आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

अंधारसांगवी येथे पाहणी केली आहे. गत महिन्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले आहे. त्यामुळे पुन्हा पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

--------------------------------

पुलावरून पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला!

परिसरातील पुलाची उंची कमी असल्याने नदी, नाल्यांना पूर येताच पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पांढुर्ण्यासह पिंपळडोळी, नवेगाव, सोनुना, जांभ, उंबरवाडी, दधम, चोंढी, धरण, घोटमाळ, भौरद, चारमोळी आदी गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर थातूरमातूर पुलावर मुरुम टाकण्यात येतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पूल उभारण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

गुरांचे प्राण वाचले

आंधारसांगवी येथील नदीला पूर आला होता. सायंकाळच्या सुमारास गुरे घरी येत असताना पुराच्या पाण्यात २५ ते ३० गुरे वाहून गेली होती. सर्व गुरे निर्गुणा धरणाच्या काठापर्यंत गेल्यावर तेथून बाहेर पडले सुदैवाने सर्व गुरे सुखरूप घरी परतले. जीवित हानी झाली नाही.

----------------------

धामोरी परिसरात जोरदार पाऊस

जामठी बु.: धामोरी परिसरात दि. २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावाजवळील नाल्यास पूर आला होता. पुरामुळे पुलाजवळचा रस्त्याचा काही भाग खरडून गेला आहे. नाल्याच्या काठाच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.