शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या ...

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने ३० हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, तब्बल २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे.

पाऊस सतत सुरू असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत महिन्यातही परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्व्हे करण्यात आला; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिसरात पिके काढणीला आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतित आहे. उडीद, मूग पिके हातातून गेली आता सोयबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र तेही हातातून जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी अमित सबनीस, तलाठी लाड आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

अंधारसांगवी येथे पाहणी केली आहे. गत महिन्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले आहे. त्यामुळे पुन्हा पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

--------------------------------

पुलावरून पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला!

परिसरातील पुलाची उंची कमी असल्याने नदी, नाल्यांना पूर येताच पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पांढुर्ण्यासह पिंपळडोळी, नवेगाव, सोनुना, जांभ, उंबरवाडी, दधम, चोंढी, धरण, घोटमाळ, भौरद, चारमोळी आदी गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर थातूरमातूर पुलावर मुरुम टाकण्यात येतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पूल उभारण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

गुरांचे प्राण वाचले

आंधारसांगवी येथील नदीला पूर आला होता. सायंकाळच्या सुमारास गुरे घरी येत असताना पुराच्या पाण्यात २५ ते ३० गुरे वाहून गेली होती. सर्व गुरे निर्गुणा धरणाच्या काठापर्यंत गेल्यावर तेथून बाहेर पडले सुदैवाने सर्व गुरे सुखरूप घरी परतले. जीवित हानी झाली नाही.

----------------------

धामोरी परिसरात जोरदार पाऊस

जामठी बु.: धामोरी परिसरात दि. २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावाजवळील नाल्यास पूर आला होता. पुरामुळे पुलाजवळचा रस्त्याचा काही भाग खरडून गेला आहे. नाल्याच्या काठाच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.