शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अंधारसांवी येथे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या ...

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील अंधारसांगवी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली असून, नदीनाले दुथडी भरून वाहत होते. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने ३० हेक्टर शेतजमीन खरडून गेली असून, तब्बल २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे.

पाऊस सतत सुरू असल्याने शेतकरी धास्तावला आहे. गत महिन्यातही परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. याचा सर्व्हे करण्यात आला; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिसरात पिके काढणीला आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतित आहे. उडीद, मूग पिके हातातून गेली आता सोयबीनवर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र तेही हातातून जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी अमित सबनीस, तलाठी लाड आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

------------------------------------------------

अंधारसांगवी येथे पाहणी केली आहे. गत महिन्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले आहे. त्यामुळे पुन्हा पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

-दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

--------------------------------

पुलावरून पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला!

परिसरातील पुलाची उंची कमी असल्याने नदी, नाल्यांना पूर येताच पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पांढुर्ण्यासह पिंपळडोळी, नवेगाव, सोनुना, जांभ, उंबरवाडी, दधम, चोंढी, धरण, घोटमाळ, भौरद, चारमोळी आदी गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर थातूरमातूर पुलावर मुरुम टाकण्यात येतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पूल उभारण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------

गुरांचे प्राण वाचले

आंधारसांगवी येथील नदीला पूर आला होता. सायंकाळच्या सुमारास गुरे घरी येत असताना पुराच्या पाण्यात २५ ते ३० गुरे वाहून गेली होती. सर्व गुरे निर्गुणा धरणाच्या काठापर्यंत गेल्यावर तेथून बाहेर पडले सुदैवाने सर्व गुरे सुखरूप घरी परतले. जीवित हानी झाली नाही.

----------------------

धामोरी परिसरात जोरदार पाऊस

जामठी बु.: धामोरी परिसरात दि. २५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावाजवळील नाल्यास पूर आला होता. पुरामुळे पुलाजवळचा रस्त्याचा काही भाग खरडून गेला आहे. नाल्याच्या काठाच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.