शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

कॅनॉलच्या दुरुस्तीअभावी धरणाचे पाणी रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

अमोल सोनोने पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील ...

अमोल सोनोने

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील पाणी रस्त्यावर येत असून, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

चोंडी नजीक असलेल्या निर्गुणा धरण मायनरवर पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधण्यात आल्या आहेत. यापैकी काही नाल्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही कॅनॉलची साफसफाईच करण्यात आली नाही. परिणामी कॅनॉलला भेगा पडल्या आहेत. यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. गत महिन्याभरापासून रस्त्यावर पाणी वाहत असून, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चोंडी -मेडशी रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर डबके साचले आहेत. शासन एकीकडे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो; मात्र दुसरीकडे पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. पातूर तालुक्यात धरणांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे, परंतु योग्य व्यवस्थापनाअभावी पाण्यापासून अनेकांना वंचित राहावे लागते. चोंडी निर्गुणा शिवारात या पाण्याचा अपव्यय सुरू असल्याने संबंधित विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)

सिंचनासाठी अडचण

पातूर तालुक्यातील चोंडी परिसरातील निर्गुणा धरणावरील कॅनॉलची साफसफाई, दुरुस्ती न केल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशातच पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.