शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कॅनॉलच्या दुरुस्तीअभावी धरणाचे पाणी रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

अमोल सोनोने पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील ...

अमोल सोनोने

पांढुर्णा: पातूर तालुक्यातील चोंडीनजीक निर्गुणा धरणावर असलेल्या कॅनॉलची दुरुस्ती केली नसल्यामुळे तसेच काही नाल्या जीर्ण झाल्यामुळे धरणातील पाणी रस्त्यावर येत असून, लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

चोंडी नजीक असलेल्या निर्गुणा धरण मायनरवर पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या बांधण्यात आल्या आहेत. यापैकी काही नाल्या जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही कॅनॉलची साफसफाईच करण्यात आली नाही. परिणामी कॅनॉलला भेगा पडल्या आहेत. यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. गत महिन्याभरापासून रस्त्यावर पाणी वाहत असून, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चोंडी -मेडशी रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर डबके साचले आहेत. शासन एकीकडे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो; मात्र दुसरीकडे पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. पातूर तालुक्यात धरणांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे, परंतु योग्य व्यवस्थापनाअभावी पाण्यापासून अनेकांना वंचित राहावे लागते. चोंडी निर्गुणा शिवारात या पाण्याचा अपव्यय सुरू असल्याने संबंधित विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. (फोटो)

सिंचनासाठी अडचण

पातूर तालुक्यातील चोंडी परिसरातील निर्गुणा धरणावरील कॅनॉलची साफसफाई, दुरुस्ती न केल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशातच पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी होत आहे.