शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

लॉकडाऊनमुळे दुग्ध व्यावसायिक अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायाला फटका बसला असून, दुग्ध व्यवसायही डबघाईस आला ...

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायाला फटका बसला असून, दुग्ध व्यवसायही डबघाईस आला आहे. शहरातील हॉटेल, माॅल बंद असल्याने दुग्ध व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. तसेच ग्राहकांकडूही वसुली होत नसल्याने दुग्ध व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

शेतीला जोडधंदा असावा म्हणून अनेक युवक दुग्ध व्यवसायाकडे वळले. मात्र, हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे लॉकडाऊन अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण करेल, असे कधी वाटले नाही. लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक मॉल, हॉटेल, स्वीटचे दुकाने बंद असल्याने दुधाची पाहिजे तेवढ्या प्रमाणात विक्री होत नाही. तसेच जे ग्राहक जुळले आहेत, त्यांच्याकडून वसुलीस विलंब होत असल्याने चाऱ्याचा खर्चही महिन्याकाठी वसूल होणे कठीण झाले आहे.

--------------------------------

लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग घरीच आहे. तसेच अनेक ग्राहकांचे हॉटेल, चहाची दुकाने तसेच मालवाहू साधणे बंद असल्याने ग्राहकांकडून वसुलीस विलंब होत आहे. दुसरीकडे जनावरांची ढेप, चारा नियमित आणणे गरजेचे असते. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाकडून मदतीची आशा आहे.

-रामभाऊ घोगरे, दुग्ध व्यावसायिक, टाकळी खुरेशी.

------------------------

लॉकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे दूध विक्रीवर परिणाम झाला असून, दुसरीकडे जनावरांचा चारा, तसेच शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.

- गुलाब पागृत, दुग्ध व्यावसायिक, खरप, बु.

---------------------------------------

ढेपीचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद असल्याने गुरांच्या किमती वाढल्या आहेत. चाऱ्याचे दरही वाढले आहेत. असे असतानाही दुधाचे दर मात्र जैसे थे असल्याने हा व्यावसाय न परवडणारा ठरत आहे. शासनाने मदत द्यावी.

-अमोल महल्ले, दुग्ध व्यावसायिक, पाचपिंपळ.

-----------------------------

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कमी कमी एक महिना पुरेल इतका चारा साठवून ठेवणे गरजेचे असताना आर्थिक टंचाईमुळे ते शक्य नसल्याने पशुपालक चिंतेत आहे. यामुळे शासनाने दुग्ध व्यावसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.