शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जिल्ह्यात जमावबंदी लागू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST

अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही.

फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी अखेर पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ९३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच िकंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही. जमावबंदीच्या कालवधीत जिल्ह्यातील धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादींसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. तसेच मिरवणुका व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्न समारंभांसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार असून, लग्नसमारंभांसाठी १० वाजेपर्यंतच परवानगी राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक महानरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात देण्यात आले. जिल्ह्यातील धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

शाळा, महाविद्यालये बंद!

जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालये, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.