शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

जिल्ह्यात जमावबंदी लागू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST

अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

अकोला: जिल्ह्यात गत पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही.

फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी अखेर पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ९३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच िकंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गर्दी करता येणार नाही. जमावबंदीच्या कालवधीत जिल्ह्यातील धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादींसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. तसेच मिरवणुका व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. लग्न समारंभांसाठी केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येणार असून, लग्नसमारंभांसाठी १० वाजेपर्यंतच परवानगी राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी स्थानिक महानरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात देण्यात आले. जिल्ह्यातील धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करुन फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

शाळा, महाविद्यालये बंद!

जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा, सर्व महाविद्यालये, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.