शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

संचारबंदीचा भाजीबाजाराला फटका; उलाढाल निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे निर्बंध ...

अकोला : कोरोनाच्या संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता आठवडी बाजार बंद आहे. भाजीपाला बाजारालाही वेळेचे निर्बंध आहे. त्याचे परिणाम भाजी बाजारात पहायला मिळत आहे. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज केवळ १००-१२० क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सर्वच व्यवसायावर निर्बंध आले आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. अकोल्यासह बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील व्यापारी येथील भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात; मात्र ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळत नाही. परिणामी, शेतकरी हैराण झाला आहे. शहरातील भाजी बाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. शहरात भाजीपाला फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही सकाळी ७ ते ११ पर्यंत वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दर चांगला मिळत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून माल घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही, असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचे करायचे काय, या विचाराने शेतकरी चिंतित आहे.

--बॉक्स--

गुरुवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी - ८ ते १० रुपये

टोमॅटो - १० ते १२ रुपये

भेंडी - २० ते २५ रुपये

कारले - १५ ते २० रुपये

गवार - २५ ते ३० रुपये

हिरवी मिरची - २० ते २५ रुपये

काकडी - १० ते १२ रुपये

हिरवा कांदा - १५ ते २० रुपये

कांदा - १० ते १२ रुपये

बटाटा - १० ते १२ रुपये

लसूण - ४० ते ५० रुपये

--बॉक्स--

भाजीपाला फेकून देण्याची वेळ

जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतमालाची उलाढाल ठप्प झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर भाजीपाला बाजारपेठेत न आणता शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे.

--बॉक्स--

चार तासांत विक्री होणार तरी किती?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमध्ये भाजीपाला विक्रीला केवळ चार तास मिळत आहे. त्यामुळे या वेळात भाजीपाला विक्री होणार तरी किती, असा प्रश्न निर्माण होत आहे. या वेळेच्या निर्बंधांमुळे भाजीपाला विक्री कमी होत आहे. त्यामुळे व्यापारीही माल घेण्यास तयार नाही.

--कोट--

कोरोनामुळे आठवडी बाजार बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

अनंता चिंचोळकर, व्यापारी