शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

संचारबंदीचा फळ बाजाराला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ ...

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कमी दरात मालाची विक्री करावी लागत आहे. अकोल्यासह औरंगाबाद, जालना, नागपूर, परभणी या जिल्ह्यातून अकोल्यातील बाजारात फळांचा माल येत असतो; परंतु ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. जिल्ह्यातही सकाळी ११ पर्यंत फळविक्रीची परवानगी आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांकडून मालाची उचल कमी प्रमाणात होत आहे. याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. फळ बाजारात मालाला समाधानकारक दर मिळत नाही. शहरातील फळ व भाजीबाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. त्यामुळे माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

--बॉक्स--

टरबूज, खरबूजची आवक ६० टक्के

संचारबंदीमुळे ऐन उन्हाळ्यात टरबूज, खरबूज विक्री घटली आहे. उचल नसल्याने बाजारात ६० टक्के आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर आंब्याची विक्री ४० टक्के घटली आहे. चार तासांत माल विकावा तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

अननसची मागणी शून्यावर

अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने जिल्ह्यातील रसांची दुकाने बंद आहेत. रसविक्री बंद असल्याने अननसची मागणी शून्यावर आली आहे. दरही कमी झाले आहे. यासोबत मोसंबीची मागणीही घटली आहे.

--कोट--

कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने मालाची उचल कमी आहे. फळविक्रेते माल कमी प्रमाणात घेत असल्याने बाजारात मालाची आवक घटली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

आरीफ खान, फळ व्यापारी