शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

संचारबंदीचा फळ बाजाराला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ ...

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कमी दरात मालाची विक्री करावी लागत आहे. अकोल्यासह औरंगाबाद, जालना, नागपूर, परभणी या जिल्ह्यातून अकोल्यातील बाजारात फळांचा माल येत असतो; परंतु ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. जिल्ह्यातही सकाळी ११ पर्यंत फळविक्रीची परवानगी आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांकडून मालाची उचल कमी प्रमाणात होत आहे. याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. फळ बाजारात मालाला समाधानकारक दर मिळत नाही. शहरातील फळ व भाजीबाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. त्यामुळे माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

--बॉक्स--

टरबूज, खरबूजची आवक ६० टक्के

संचारबंदीमुळे ऐन उन्हाळ्यात टरबूज, खरबूज विक्री घटली आहे. उचल नसल्याने बाजारात ६० टक्के आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर आंब्याची विक्री ४० टक्के घटली आहे. चार तासांत माल विकावा तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

अननसची मागणी शून्यावर

अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने जिल्ह्यातील रसांची दुकाने बंद आहेत. रसविक्री बंद असल्याने अननसची मागणी शून्यावर आली आहे. दरही कमी झाले आहे. यासोबत मोसंबीची मागणीही घटली आहे.

--कोट--

कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने मालाची उचल कमी आहे. फळविक्रेते माल कमी प्रमाणात घेत असल्याने बाजारात मालाची आवक घटली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

आरीफ खान, फळ व्यापारी