शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

संचारबंदीचा फळ बाजाराला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:19 IST

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ ...

संचारबंदीमुळे सर्वसामान्यांसोबत शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगाम समोर आला असून, मशागतीसाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यात फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्याने कमी दरात मालाची विक्री करावी लागत आहे. अकोल्यासह औरंगाबाद, जालना, नागपूर, परभणी या जिल्ह्यातून अकोल्यातील बाजारात फळांचा माल येत असतो; परंतु ग्रामीण भागातील आठवडी बाजार ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. जिल्ह्यातही सकाळी ११ पर्यंत फळविक्रीची परवानगी आहे. त्यामुळे फळविक्रेत्यांकडून मालाची उचल कमी प्रमाणात होत आहे. याचा फटका उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. फळ बाजारात मालाला समाधानकारक दर मिळत नाही. शहरातील फळ व भाजीबाजार सुरू आहे; पण त्यालाही वेळेचे बंधन आहे. त्यामुळे माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

--बॉक्स--

टरबूज, खरबूजची आवक ६० टक्के

संचारबंदीमुळे ऐन उन्हाळ्यात टरबूज, खरबूज विक्री घटली आहे. उचल नसल्याने बाजारात ६० टक्के आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर आंब्याची विक्री ४० टक्के घटली आहे. चार तासांत माल विकावा तरी किती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

--बॉक्स--

अननसची मागणी शून्यावर

अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने जिल्ह्यातील रसांची दुकाने बंद आहेत. रसविक्री बंद असल्याने अननसची मागणी शून्यावर आली आहे. दरही कमी झाले आहे. यासोबत मोसंबीची मागणीही घटली आहे.

--कोट--

कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने मालाची उचल कमी आहे. फळविक्रेते माल कमी प्रमाणात घेत असल्याने बाजारात मालाची आवक घटली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

आरीफ खान, फळ व्यापारी